क्रीडा

Ind Vs Pak Asia Cup : ''भारतासमोर खेळण्याशिवाय पर्याय नाही''; अखेर BCCI ने सांगितले कारण

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना आज (दि. १४) रंगणार आहे. रात्री ८ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

नेहा जाधव - तांबे

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना आज (दि. १४) रंगणार आहे. रात्री ८ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. हा सामना रद्द करण्याची मागणी होत असतानाच BCCI ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

देवजीत सैकिया यांचे स्पष्टीकरण

BCCI चे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, "आम्ही आशिया कपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला कारण ही बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. ऑलिंपिक, फिफा किंवा आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्ससारख्या स्पर्धांमध्ये जसे सहभागी व्हावे लागते, तसेच हेही आहे. अशा बहुपक्षीय स्पर्धांवर बहिष्कार टाकल्यास भविष्यात भारताला कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसेल."

सैकिया यांनी पुढे स्पष्ट केले की, "जर हा सामना द्विपक्षीय असता, तर आम्ही नकार दिला असता. पण बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळणे हे भारत सरकारचे धोरण आहे. त्यामुळे भारताला खेळण्याशिवाय पर्याय नाही."

माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही स्पष्ट केले होते की, भारत-पाकिस्तानमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका होणार नाही. मात्र, आशिया कप किंवा विश्वचषकासारख्या बहुपक्षीय स्पर्धांमध्ये भारताला उतरावेच लागेल.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची आता महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यामधील अन्न गुणवत्तेवर करडी नजर; 'स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स' लागू

ठाण्यात उद्या ‘थर’थराट; दहीहंडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त, २३०७ पोलीस तैनात

Ratnagiri : रघुवीर घाटात दरड कोसळली; एसटी बस घाटातच अडकली, १५ ते २० गावांचा संपर्क तुटला, Video

Mumbai : सप्टेंबर अखेरपर्यंत सायन पूल खुला करण्याचे नियोजन; पुलाच्या दोन्ही बाजूला व्हर्टिकल गार्डनचा पर्याय - महापौर रितू तावडे

IAS Officer Transfer : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या