के. एल. राहुलचे संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

भारत-अ संघासाठी राहुल, तनुष, कंबोजची अर्धशतके; इंग्लंड लायन्सविरुद्धचा सामना अनिर्णित

Swapnil S

नॉर्थहॅम्पटन : भारत-अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील दुसरा चार दिवसीय सामनाही अनिर्णित राहिला. दुसऱ्या डावात भारत-अ संघाकडून के. एल. राहुल (६४ चेंडूंत ५१ धावा), तनुष कोटियन (१०८ चेंडूंत नाबाद ९०), कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (९२ चेंडूंत ८०) आणि अंशुल कंबोज (८६ चेंडूंत नाबाद ५१) यांनी अर्धशतके झळकावली.

भारत-इंग्लंड यांच्यात २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी सराव म्हणून भारताच्या मुख्य संघांतील अनेक खेळाडू भारत-अ संघाकडून या मालिकेत खेळले. आता भारतीय संघाचा भारत-अ संघाशी सराव सामनाही होणार आहे. शुभमन गिल यंदा भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणार असून रोहित शर्मा व विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर प्रथमच भारतीय संघ एखादी मालिका खेळणार आहे.

दरम्यान, भारताच्या पहिल्या डावातील ३४८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंड लायन्सने ३२७ धावा केल्या. मग दुसऱ्या डावात भारत-अ संघाने ७ बाद ४१७ धावांवर डाव घोषित केला. राहुल, अभिमन्यू, तनुष, अंशुल यांनी अर्धशतके झळकावली. तसेच नितीश रेड्डी (४२), शार्दूल ठाकूर (३४) यांनीही योगदान दिले. मग दुसऱ्या डावात इंग्लंड लायन्सने ३ बाद ३२ धावा केल्यावर वेळ संपल्याने सामना अनिर्णित राहिला.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’