क्रीडा

भारतीय महिलांचा टी-२० मालिकेवर कब्जा; तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ६० धावांनी वर्चस्व; रिचा, स्मृतीची तुफानी अर्धशतके

कर्णधार स्मृती मानधना (४७ चेंडूंत नाबाद ७७ धावा) आणि युवा रिचा घोषने (२१ चेंडूंत ५४ धावा) झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजला ६० धावांनी धूळ चारली. या विजयासह भारताने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

Swapnil S

नवी मुंबई : कर्णधार स्मृती मानधना (४७ चेंडूंत नाबाद ७७ धावा) आणि युवा रिचा घोषने (२१ चेंडूंत ५४ धावा) झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजला ६० धावांनी धूळ चारली. या विजयासह भारताने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने २०१९नंतर प्रथमच मायदेशात टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या २१८ धावांचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाला २० षटकांत ९ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. राधा यादवने ४ बळी मिळवले.

तत्पूर्वी, स्मृतीने १३ चौकारांसह ३०वे, तर रिचाने ३ चौकार व ५ षटकारांसह दुसरे अर्धशतक साकारले. मुख्य म्हणजे रिचाने १८ चेंडूंतच अर्धशतक फटकावून टी-२०मध्ये सर्वात जलद अर्धशतक फटकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ३ बाद २१७ धावांचा डोंगर उभारला. भारताची ही टी-२०तील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. रिचा सामनावीर ठरली. तर सलग ३ अर्धशतके झळकावणाऱ्या स्मृतीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

आता उभय संघांत बडोदा येथे ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. २२ तारखेपासून या मालिकेस प्रारंभ होईल.

संक्षिप्त धावफलक

g भारत : २० षटकांत ४ बाद २१७ (स्मृती मानधना ७७, रिचा घोष ५४, राघवी बिस्त नाबाद ३१; चिनले हेन्री १/१४) विजयी वि. g वेस्ट इंडिज : २० षटकांत ९ बाद १५७ (चिनले हेन्री ४३, डिएंड्रा डॉटिन २५; राधा यादव ४/२९)

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे