क्रीडा

भारतीय महिलांचा टी-२० मालिकेवर कब्जा; तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर ६० धावांनी वर्चस्व; रिचा, स्मृतीची तुफानी अर्धशतके

कर्णधार स्मृती मानधना (४७ चेंडूंत नाबाद ७७ धावा) आणि युवा रिचा घोषने (२१ चेंडूंत ५४ धावा) झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजला ६० धावांनी धूळ चारली. या विजयासह भारताने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

Swapnil S

नवी मुंबई : कर्णधार स्मृती मानधना (४७ चेंडूंत नाबाद ७७ धावा) आणि युवा रिचा घोषने (२१ चेंडूंत ५४ धावा) झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजला ६० धावांनी धूळ चारली. या विजयासह भारताने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने २०१९नंतर प्रथमच मायदेशात टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या २१८ धावांचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाला २० षटकांत ९ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. राधा यादवने ४ बळी मिळवले.

तत्पूर्वी, स्मृतीने १३ चौकारांसह ३०वे, तर रिचाने ३ चौकार व ५ षटकारांसह दुसरे अर्धशतक साकारले. मुख्य म्हणजे रिचाने १८ चेंडूंतच अर्धशतक फटकावून टी-२०मध्ये सर्वात जलद अर्धशतक फटकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यामुळे भारताने २० षटकांत ३ बाद २१७ धावांचा डोंगर उभारला. भारताची ही टी-२०तील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. रिचा सामनावीर ठरली. तर सलग ३ अर्धशतके झळकावणाऱ्या स्मृतीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

आता उभय संघांत बडोदा येथे ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. २२ तारखेपासून या मालिकेस प्रारंभ होईल.

संक्षिप्त धावफलक

g भारत : २० षटकांत ४ बाद २१७ (स्मृती मानधना ७७, रिचा घोष ५४, राघवी बिस्त नाबाद ३१; चिनले हेन्री १/१४) विजयी वि. g वेस्ट इंडिज : २० षटकांत ९ बाद १५७ (चिनले हेन्री ४३, डिएंड्रा डॉटिन २५; राधा यादव ४/२९)

Mumbai : आता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी; पालिका मुख्यालयातील भाजप कार्यालयात मशीन कार्यान्वित

शहरांचे होणार विशेष ऑडिट; शहरांमधील जीवनमान, सुविधांची उपलब्धता निकषांवर होणार लेखापरीक्षण

बंगळुरू ते मुंबई प्रवास होणार सुसाट! जूनअखेरीस सुपरफास्ट ट्रेन धावणार; वंदे भारत स्लीपरचीही शक्यता

मद्य दरवाढीसाठी उत्पादकांचे राज्य सरकारांना साकडे; पश्चिम आशियातील संकटामुळे उत्पादन खर्चात वाढ, बाटल्या, कॅनच्या किमती वधारल्या

Thane : १४ दरडप्रवण भागांतील रहिवाशांना नोटीस; मान्सूनपूर्व महापालिकेची हालचाल, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन