PM
क्रीडा

भारताचा मालिका विजय ;तिसऱ्या लढतीत आफ्रिकेवर ७८ धावांनी वर्चस्व

प्रथम फलंदाजी करताना भारताने सॅमसनच्या पहिल्या शतकाच्या बळावर ५० षटकांत ८ बाद २९६ धावांपर्यंत मजल मारली.

Swapnil S

पार्ल : संजू सॅमसनने (११४ चेंडूंत १०८ धावा) झळकावलेल्या शतकाला अर्शदीप सिंगच्या (३० धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. सॅमसन सामनावीर, तर तीन सामन्यांत सर्वाधिक १० बळी घेणारा अर्शदीप मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने सॅमसनच्या पहिल्या शतकाच्या बळावर ५० षटकांत ८ बाद २९६ धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्मा (५२), रिंकू सिंग (३८) यांनीही उत्तम योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव ४५.५ षटकांत २१८ धावांत आटोपला. टॉनी डी झॉर्झीने ८१ धावांची झुंज दिली. मात्र अर्शदीपने चार, तर आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून आफ्रिकेला रोखले. भारताने आफ्रिकेत दुसऱ्यांदा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच २०२३ या वर्षात भारताने एकंदर २७वा एकदिवसीय सामना जिंकला.

शिमग्याला गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी गुड न्यूज! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी १ मार्चपासून; पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

नागपुरात १२ वीचा केमिस्ट्री पेपर लीक! विद्यार्थिनीच्या वारंवार वॉशरूमला जाण्यामुळे आली शंका; मोबाईलमध्ये सापडला पुरावा

आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास; मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा; MMRDA च्या अर्थसंकल्पात समावेश

Mumbai : मोनोरेल पुन्हा धावणार! सीसीटीव्ही, चार्जिंग पॉइंट्स, स्मार्ट सिग्नलिंग अशा २१ नव्या सुविधांसह सज्ज; MMRDA ची घोषणा

महामार्गावर टोलवसुली होणार कॅशलेस; १ एप्रिलपासून अंमलबजावणीचे संकेत