क्रीडा

जय जवान पथकाचा पुन्हा एकदा विजयी नारा! सलग दुसऱ्यांदा मिळवले Pro Govinda स्पर्धेचे जेतेपद

वरळीच्या एनएससीआय डोम येथे पार पडलेल्या प्रो गोविंदा स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातही जय जवान पथक म्हणजेच सातारा सिंघम्स यांनी विजेतेपद काबिज केले.

Swapnil S

मुंबई : जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने आपणच दहीहंडी खेळातील राजे असल्याचे पुन्हा दाखवून दिले. वरळीच्या एनएससीआय डोम येथे पार पडलेल्या प्रो गोविंदा स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वातही जय जवान पथक म्हणजेच सातारा सिंघम्स यांनी विजेतेपद काबिज केले. त्यांचे हे सलग दुसरे जेतेपद ठरले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांना २५ लाखांच्या पारितोषिकासह गौरविण्यात आले. कोल्हापूर किंग्ज (बालवीर गोविंदा) संघाने उपविजेतेपद मिळवले.

अंतिम फेरी फार रंगतदार झाली. कोल्हापूर किंग्जला १५ लाखांचे बक्षीस देण्यात आले. अंतिम फेरीने सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध क्रीडा स्पर्धेसाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले. आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे संस्थापक व अध्यक्ष, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे संचालक मजहर नाडियादवाला, प्रो गोविंदा लीगचे संचालक मोहम्मद मोरानी आणि विहंग सरनाईक यांच्यासह मान्यवर नेते यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात चार गटांमध्ये १६ मातब्बर संघ सहभागी झाले होते. प्रत्येक गट टप्प्यातील सामना हा सहभागी संघांच्या कौशल्याचा आणि रणनीतीचा पुरावा होता आणि प्रेक्षकांसाठी रंजक ठरला. उपांत्य फेरीत विलक्षण चुरस निर्माण झाली होती. पहिल्या उपांत्य फेरीत कोल्हापूर किंग्ज (बलवीर गोविंदा) आणि लातूर लिजेंड्स (यश गोविंदा) यांच्यात सामना झाला. अपवादात्मक सांघिक कार्य आणि रणनीतीसह, किंग्जने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसऱ्या उपांत्य फेरीत, सातारा सिंघम (जय जवान गोविंदा) अलिबाग नाईट्स (श्री अग्रेश्वर गोविंदा) आमनेसामने आले. मजबूत रचना आणि सामरिक पराक्रमासाठी ओळखले जाणाऱ्या कौशल्याच्या जोरावर सातारा सिंघम विजयी झाले आणि त्यांनी एका रोमांचक अंतिम लढतीतील स्थान निश्चित केले.

मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना दिलासा; ३० दिवसांची व्हिसा मुदतवाढ, ओव्हरस्टे दंडही माफ

LPG सिलिंडर बुकिंग आता आणखी सोपं! व्हॉट्सॲप, मिस्ड कॉलपासून ॲपपर्यंत अनेक सुविधा उपलब्ध

एका दिवसात ४५ हजार गॅस सिलिंडरचे वितरण; ठाणे शिधावाटप विभागाचा दावा; घरगुती पुरवठा सुरळीत, व्यावसायिकवर तात्पुरती मर्यादा

मुंबईकरांनो सावधान, यंदा पावसाळ्यात समुद्राला उधाण; २४ दिवस समुद्रात उसळणार मोठ्या लाटा

बालकांच्या सायबर सुरक्षिततेसाठी ‘डिजिटल कवच’ आवश्यक; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती