क्रीडा

आशिया क्रिकेट स्पर्धेतून भारताचा वेगवान गोलंदाज 'या' कारणामुळे बाहेर

भारत या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर करणार असतानाच भारतीय संघासाठी वाईट बातमी मिळाली आहे

वृत्तसंस्था

येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतून भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारत या स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर करणार असतानाच भारतीय संघासाठी वाईट बातमी मिळाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो आशिया चषकामध्ये खेळणार नाही. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने पुनरागमन करावे, अशी आमची इच्छा आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आशिया चषकामध्ये बुमराहला सहभागी करून धोका पत्करता येणार नाही. त्याचा समावेश झाल्यास आणि तो खळल्यास त्याची दुखापत वाढू शकते.

आशिया चषक स्पर्धेसाठी विराट कोहली, के एल राहुल, जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन होण्याची अपेक्षा होती. बुमराह आता खेळू शकणार नाही. या स्पर्धेसाठी आतापर्यंत केवळ पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे.

यावेळच्या आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले होते; मात्र तेथील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती बघता स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे हलविण्यात आली. दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथे टी-२० फॉर्मेटमध्ये आशिया चषक स्पर्धा होणार आहे.

SpiceJet Flight : टेकऑफच्या आधी विमानात असह्य उकाडा; श्वास घेण्यासही त्रास, प्रवाशांचा संताप, Video व्हायरल

Mumbai : घाटकोपरमध्ये दरड कोसळली; ६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू, Video

Mumbai Crime : प्रेमविवाहानंतर ५ वर्षांत संसाराचा भयंकर शेवट! पत्नीच्या छातीत चाकू भोसकला, ४ वर्षांच्या मुलाला सोडून पती फरार

Gujarat : इमारतीच्या ३२व्या मजल्यावर क्रेनला लटकलेल्या अवस्थेत कामगाराचा मृतदेह; धक्कादायक घटनेचा VIDEO समोर

IndiGo विमानाचं इंजिन हवेतच बंद; २२४ प्रवाशांचा जीव टांगणीला, चेन्नई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग