क्रीडा

नीरजकडून संघटनेच्या निर्णयाचे स्वागत; लवकरच ९० मीटरचे लक्ष्य गाठण्याची खात्री

“पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मी ९० मीटरचे अंतर गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. मला माझ्या क्षमतेवर व मेहनतीवर विश्वास आहे. माझे शरीर सध्या उत्तम लयीत असून तंदुरुस्तीवर मी अधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे यावेळी ९० मीटरचे अंतर गाठेनच,” असे नीरज म्हणाला.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा तारांकित भालेफेकपटू नीरजने जागतिक ॲथलेटिक्स संघटनेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. “टेनिस, फुटबॉल, क्रिकेट यांसारख्या खेळांत जितका पैसा आहे, तितका ॲथलेटिक्समध्ये नाही. मात्र संघटनेच्या या निर्णयामुळे ॲथलिट‌्सचे मनोबल उंचावले जाईल. अन्य क्रीडा प्रकारांनीसुद्धा याद्वारे प्रेरणा घेत पदकविजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिकही द्यावे, जेणेकरून खेळाडूंचे भविष्य सुरक्षित होईल,” असे नीरज म्हणाला.

“पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मी ९० मीटरचे अंतर गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. मला माझ्या क्षमतेवर व मेहनतीवर विश्वास आहे. माझे शरीर सध्या उत्तम लयीत असून तंदुरुस्तीवर मी अधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळे यावेळी ९० मीटरचे अंतर गाठेनच,” असे नीरज म्हणाला. किशोर जेनासुद्धा ९० मीटरचे अंतर गाठू शकतो, असेही नीरजने सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरज व किशोर या भारताच्याच दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण व रौप्यपदक काबिज केले होते. नीरजने २०२२च्या डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर अंतरावर भालाफेक केली होती. यंदा त्याचे ९० मीटरचे अंतर गाठण्याचे लक्ष्य आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार