क्रीडा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईची अडखळती सुरुवात

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने सलग तीन सामने जिंकून गटात अग्रस्थान राखले आहे.

Swapnil S

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्धच्या साखळी सामन्यात मुंबईने अडखळती सुरुवात केली. ब-गटातील या लढतीत मुंबईने पहिल्या दिवशी चहापानापर्यंत ७ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारली होती.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने सलग तीन सामने जिंकून गटात अग्रस्थान राखले आहे. मात्र अंकित राजपूत आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे फलंदाज ढेपाळले. रहाणे (८), भूपेन लालवाणी (१५), शिवम दुबे (४) यांनी निराशा केली. ५ बाद ७४ वरून शम्स मुलानी (नाबाद ४१) व प्रसाद पवार (३६) यांनी सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचून मुंबईला सावरले.

Mumbai : ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा अन् नववर्षाचा जल्लोष; मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रा

Air Travel Alert : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' ४ विमानतळांवर बंदी; फ्लाइट्सवर होणार परिणाम

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

Nagpur : मॅट्रिमोनियल साईटवरील ओळख महागात पडली; मॉर्फ अश्लील व्हिडिओने ३६ वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल

भिवंडीत फर्निचर मार्केटला भीषण आग; अनेक दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली