क्रीडा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईची अडखळती सुरुवात

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने सलग तीन सामने जिंकून गटात अग्रस्थान राखले आहे.

Swapnil S

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्धच्या साखळी सामन्यात मुंबईने अडखळती सुरुवात केली. ब-गटातील या लढतीत मुंबईने पहिल्या दिवशी चहापानापर्यंत ७ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारली होती.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने सलग तीन सामने जिंकून गटात अग्रस्थान राखले आहे. मात्र अंकित राजपूत आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबईचे फलंदाज ढेपाळले. रहाणे (८), भूपेन लालवाणी (१५), शिवम दुबे (४) यांनी निराशा केली. ५ बाद ७४ वरून शम्स मुलानी (नाबाद ४१) व प्रसाद पवार (३६) यांनी सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचून मुंबईला सावरले.

उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट; बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास खलबतं, जागावाटपावर झाली चर्चा?

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

PUC नसल्यास नाही मिळणार पेट्रोल-डिझेल; "No PUC, No fuel" योजना सक्तीने राबवणार - परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी