क्रीडा

...म्हणुन मी अतिशय निराश झालो आहे - जसप्रीत बुमराह

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियात येत्या १६ ऑक्टोबरपासून होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अधिकृत घोषणा करताच बुमराह भावूक झाला. बुमराह म्हणाला की, ‘‘टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्यामुळे मी अतिशय निराश झालो आहे.’’

बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.” यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना बुमराह म्हणाला, “यावेळेस मी टी-२० विश्वचषकाचा भाग नसणार, या भावनेने मी खूपच निराश झालो आहे; मात्र माझ्या प्रियजनांकडून मला मिळालेल्या शुभेच्छा, काळजी आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे.” बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकातून बाहेर झाल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याआधीच्या सराव सत्रादरम्यान बुमराहला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्यानंतर तो टी-२० विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. बुमराह टी-२० विश्वचषकातून बाहेर झाल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही बुमराहला लवकरच पुन्हा खेळताना पाहू, अशी आशा व्यक्त केली होती.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे