क्रीडा

टीम इंडियाच्या निवडीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित

सुमारे ११ महिन्यांपूर्वी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील चुकांमधून टीम इंडियाने कोणताही धडा घेतला नाही

वृत्तसंस्था

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर टप्प्यात भारताचे सलग दोन पराभव झाल्याने टीम इंडियाच्या निवडीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगामी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सुमारे ११ महिन्यांपूर्वी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील चुकांमधून टीम इंडियाने कोणताही धडा घेतला नाही. आशिया चषकातही भारत याच टॉप ऑर्डरसह उतरला होता. सर्व सामन्यांमध्ये के एल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा सलामीला आले आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आला. राहुलने चार सामन्यांत अवघ्या ७० धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १०४. ४७ इतका राहिला. कोहलीने १५४ धावा केल्या; पण त्याचा स्ट्राइक रेटही १२२.२२ इतकाच राहिला. रोहितला चारपैकी तीन सामन्यांत शानदार सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. भुवनेश्वर कुमार पुन्हा मोठ्या सामन्यात अपयशी ठरला. श्रीलंकेविरुद्ध त्याने चार षट्कात ३० धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळविण्यात अपयश आले. दुबईच्या डेड पिचवर ताशी १४०हून अधिक वेगाने गोलंदाजी टाकणारे गोलंदाज अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले. पाकिस्तान आणि श्रीलंकेकडेही या वेगाने गोलंदाजी करणारे अनेक गोलंदाज होते. भारतीय संघातील बहुतांश वेगवान गोलंदाज ताशी १२० ते १३० किमी वेगाने चेंडू टाकणारे होते. त्यामुळे त्यांची गोलंदाजी प्रभावी ठरू शकली नाही. पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना वगळता भारतीय गोलंदाजांना अपेक्षित अंतराने विकेट मिळविण्यात अपयश आले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश