ठाणे

बोईसरमध्ये धान्याचा काळाबाजार उघडकीस

बोईसर वंजारवाडा रेशन दुकानाच्या जवळ संशयास्पद रीतीने उभे असल्याचे समजताच याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना तातडीने खबर दिली

प्रतिनिधी

ऐन सणासुदीच्या दिवसात सामान्य नागरीकांना वाटप करण्यासाठी ठेवलेला बोईसर वंजारवाडा येथील रास्त भाव धान्य दुकानातील १० टन तांदूळ चोरीछूपे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याचा डाव काही जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडला आहे.

सकाळी चार वाजेच्या सुमारास बोईसर येथील एका रास्त भाव धान्य दुकानाबाहेर दोन टेम्पो बोईसर वंजारवाडा रेशन दुकानाच्या जवळ संशयास्पद रीतीने उभे असल्याचे समजताच याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना तातडीने खबर दिली. स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते येत असल्याची चाहूल लागल्यावर एक टेम्पो चालक टेम्पो घेऊन पळून गेला. तर दूसरा टेम्पो तांदळाच्या साठ्यासह पकडण्यात यश

रेशनिंगच्या तांदूळ वाहतूक करणारा एक टेम्पो पळून गेल्याने टेम्पो पकडण्यासाठी पोलिसांनी चिल्हार बोईसर रस्त्यावरील बेटेगाव चौकीवर नाकाबंदी लावली होती. सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास वाहने तपासणी सुरू असताना तांदूळ वाहतूक करणारा दुसरा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे.

तांदूळ भरलेली दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केली असून पालघर पुरवठा विभागाकडून जप्त केलेल्या धान्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

धान्य भरलेले दोन्ही टेम्पो बोईसर पोलिस स्टेशन येथे नेण्यात येऊन पुरवठा निरीक्षक देवेंद्र पाटील यांच्या समक्ष धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही वाहनामध्ये प्रत्येकी ५० किलो वजनाच्या २०० गोणी असा एकूण १० टन रेशनिंगचा तांदूळ आढळून आला असून गोणींवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा शिक्का आढळून आला आहे.

याप्रकरणी आरोपींवर अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक देवेंद्र पाटील यांनी दिली. याप्रकरणी आणखी कोण कोण सामील आहे याचा तपास बोईसर पोलिस करीत आहेत.

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला; ISMAच्या बैठकीतील आकडेवारी, एकूण ३२४ लाख टनपैकी राज्याचा वाटा ११८ लाख टन

AI क्रांती ‘वायटूके’सारखी; व्यापार मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन; भारतीय कंपन्यांना फायदा होणार, नोकऱ्यांबाबत चिंता नको