ठाणे

‘त्या’ युवकाचा २४ तास उलटूनही शोध लागला नाही

Swapnil S

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील माणकोली पुलावरून रील बनवून पुलावरून उडी मारणाऱ्या युवकाचा २४ तास उलटूनही शोध लागला नाही. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठा गाव खाडीत शोध सुरू केला. लाईफबोटीतून तीन अग्निशामक दलाच्या जवानांनी लाईफ-जॅकेट घालून शोध घेतला होता. अंधारात शोध घेणे शक्य नसल्याने अग्निशामक दलाने शोध कार्य थांबवले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळीपासून शोध घेण्यास सुरुवात झाली. अग्निशामक दलाचे आठ जवान हे बोटीतून मोठा गाव खाडीत शोध घेत आहेत. दरम्यान, घटनास्थळी डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस आणि भिवंडीतील नारपोली पोलीस दाखल झाले होते. या प्रकरणाची नोंद नारपोली पोलीस करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

जनमताचा आरसा इंडियाच्या बाजूने

सत्ता गेल्यावर मागे राहिल, कटकारस्थानांची कुरुपता

"मोदी...तेवढी तुमची लायकी नाही..." नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?

"वाटेल त्याच्या डोक्यात जिरेटोप घालू नका..." उद्धव ठाकरेंनी प्रफुल पटेलांना सुनावलं