ठाणे

Bhiwandi : रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करण्यावरून दोन कुटुंबामध्ये हाणामारी, तिघांना अटक

सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधीला जाण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली.

Swapnil S

भिवंडी : सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधीला जाण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील ठाकराचा पाडा येथून समोर आली आहे. याप्रकरणी एका कुटुंबातील तिघांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. वरुण चंद्रकांत श्रीकर (४३),पार्थ वरुण श्रीकर (२०), दर्शना वरुण श्रीकर (४१) अशी अटक केलेल्या कुटुंबीयांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमान रतन ठाकरे हा ठाकूरपाडा गावात राहत असून त्याचा हॉटेलचा व्यवसाय आहे. दरम्यान १७ जून रोजी रात्री पाऊणे दहाच्या सुमारास नाशिक- मुंबई हायवेवरील ठाकराचा पाडा येथील बासुरी हॉटेलच्या बाजूला रत्नदीप खानावळसमोर श्रीकर कुटुंब आणि हनुमान यांच्यात रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करण्याच्या कारणावरून क्षुल्लक वाद झाला होता. दरम्यान हा वाद उफाळून आल्याने श्रीकर कुटुंबाने आपसात संगनमत करून हनुमानसह त्याच्या पत्नी व मुलीला मारहाण केली. तसेच पार्थने लोखंडी कड्याने हनुमानच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. याप्रकरणी तिघांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि गायकवाड करीत आहेत.

Iran War Impact : मध्यपूर्वेतील संघर्षातही देशात LPG पुरवठा सुरळीत; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या जाहीर, पाहा वेळापत्रक

आखाती संघर्षाचा मच्छीमारांना फटका; 'बल्क कन्झ्युमर' वर्गीकरणामुळे संताप; डिझेल दरवाढीने मासेमारी व्यवसाय ठप्प

माथेरान 'मिनी ट्रेन'च्या फेऱ्या घटल्याने पर्यटक नाराज; 'मोटारकार' सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन