ठाणे

Bhiwandi : रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करण्यावरून दोन कुटुंबामध्ये हाणामारी, तिघांना अटक

सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधीला जाण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली.

Swapnil S

भिवंडी : सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधीला जाण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील ठाकराचा पाडा येथून समोर आली आहे. याप्रकरणी एका कुटुंबातील तिघांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. वरुण चंद्रकांत श्रीकर (४३),पार्थ वरुण श्रीकर (२०), दर्शना वरुण श्रीकर (४१) अशी अटक केलेल्या कुटुंबीयांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमान रतन ठाकरे हा ठाकूरपाडा गावात राहत असून त्याचा हॉटेलचा व्यवसाय आहे. दरम्यान १७ जून रोजी रात्री पाऊणे दहाच्या सुमारास नाशिक- मुंबई हायवेवरील ठाकराचा पाडा येथील बासुरी हॉटेलच्या बाजूला रत्नदीप खानावळसमोर श्रीकर कुटुंब आणि हनुमान यांच्यात रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करण्याच्या कारणावरून क्षुल्लक वाद झाला होता. दरम्यान हा वाद उफाळून आल्याने श्रीकर कुटुंबाने आपसात संगनमत करून हनुमानसह त्याच्या पत्नी व मुलीला मारहाण केली. तसेच पार्थने लोखंडी कड्याने हनुमानच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. याप्रकरणी तिघांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि गायकवाड करीत आहेत.

अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुरू; आज दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरणार

विजयी मेळावा मराठीपुरताच! त्याचा राजकारणाशी संबंध नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना-मनसे युतीबाबत संभ्रम

द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह पोस्टसाठी आचारसंहिता तयार करा! सुप्रीम कोर्टाचे केंद्र, राज्यांना निर्देश

शिवसेना नाव, चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये; सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

मार्केटिंगच्या बहाण्याने चोरीस जाईल वैयक्तिक डेटा; ‘स्पॅम विशिंग कॉल’ची डोकेदुखी थांबवा