ठाणे

Bhiwandi : रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करण्यावरून दोन कुटुंबामध्ये हाणामारी, तिघांना अटक

सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधीला जाण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली.

Swapnil S

भिवंडी : सकाळी उठल्यावर नैसर्गिक विधीला जाण्याच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील ठाकराचा पाडा येथून समोर आली आहे. याप्रकरणी एका कुटुंबातील तिघांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. वरुण चंद्रकांत श्रीकर (४३),पार्थ वरुण श्रीकर (२०), दर्शना वरुण श्रीकर (४१) अशी अटक केलेल्या कुटुंबीयांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमान रतन ठाकरे हा ठाकूरपाडा गावात राहत असून त्याचा हॉटेलचा व्यवसाय आहे. दरम्यान १७ जून रोजी रात्री पाऊणे दहाच्या सुमारास नाशिक- मुंबई हायवेवरील ठाकराचा पाडा येथील बासुरी हॉटेलच्या बाजूला रत्नदीप खानावळसमोर श्रीकर कुटुंब आणि हनुमान यांच्यात रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधी करण्याच्या कारणावरून क्षुल्लक वाद झाला होता. दरम्यान हा वाद उफाळून आल्याने श्रीकर कुटुंबाने आपसात संगनमत करून हनुमानसह त्याच्या पत्नी व मुलीला मारहाण केली. तसेच पार्थने लोखंडी कड्याने हनुमानच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. याप्रकरणी तिघांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि गायकवाड करीत आहेत.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर