ठाणे

अखेर सहा महिन्यांच्या निशंकची झुंज संपली

अवघ्या ६ महिन्यांच्या निशंक हर्षदा मयूर पगारे याच्या असामयिक निधनाने पगारे कुटुंबावर तसेच स्वराज्य संघटनेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Swapnil S

उल्हासनगर : अवघ्या ६ महिन्यांच्या निशंक हर्षदा मयूर पगारे याच्या असामयिक निधनाने पगारे कुटुंबावर तसेच स्वराज्य संघटनेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हृदय विकाराशी लढा देत असलेल्या या चिमुकल्याने वाडिया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. निशंकच्या निधनाने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.

निशंकच्या प्रकृतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून काळजीची स्थिती होती. त्याच्या हृदयाच्या विकारासाठी विविध नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र, काल रात्री १ वाजता निशंकने शेवटचा श्वास घेतला आणि पगारे कुटुंबाचे आधारस्तंभ हरपले. निशंकच्या उपचारांसाठी पगारे कुटुंबाने आर्थिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवर जिवाचे रान केले. त्याच्या उपचारासाठी स्वराज्य संघटनेने जनतेस मदतीचे आवाहन केले होते, ज्याला तळागाळातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. परंतु, नियतीच्या या कठोर निर्णयापुढे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

‘निशंकच्या जाण्याने आमचे मन हेलावले आहे. पगारे कुटुंबाच्या या कठीण प्रसंगात आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.’ अशी प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जय गायकवाड यांनी दिली.

Mumbai : "जे कमावतो ते सगळं CNG मध्येच जातं!" दरवाढीनंतर टॅक्सी चालकांचा संताप; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईत ८२ अतिधोकादायक इमारती; म्हाडाकडून जुन्या इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण

CBSE चा मोठा निर्णय! २०२७ पासून DigiLocker वर मिळणार तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती, वाचा सविस्तर

भरधाव ट्रकने कारला फरफटत नेले; थोडक्यात वाचला बाप-लेकीचा जीव, अंगावर शहारे आणणारा VIDEO व्हायरल

कोकणचा काजू आता ‘जागतिक ब्रँड’ होणार; ४० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी