लखनऊ-मुंबई प्रवासात सोन्याची बॅग गायब; तपासाचे धागेदोरे उल्हासनगरात, चार अटकेत 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

लखनऊ-मुंबई प्रवासात सोन्याची बॅग गायब; तपासाचे धागेदोरे उल्हासनगरात, चार अटकेत

लखनऊ-मुंबई प्रवासात सोन्याने भरलेली बॅग गायब झाली होती. आठ महिन्यांच्या तपासानंतर उल्हासनगरमधील चौघांना अटक झाली. आता चौघांना जामीन झाला आहेे.

Swapnil S

उल्हासनगर : लखनऊ-मुंबई प्रवासात सोन्याने भरलेली बॅग गायब झाली होती. आठ महिन्यांच्या तपासानंतर उल्हासनगरमधील चौघांना अटक झाली. आता चौघांना जामीन झाला आहेे.

नोएडा पोलिसांचे विशेष पथक सोमवारी मध्यरात्री शहरात दाखल झाले. विठ्ठलवाडी पोलिसांच्या मदतीने नोएडा पोलिसांनी हायप्रोफाईल परिवारांतील भाविषा राजानी, संतोष चौहान, धीरज लालचंदानी आणि कमल पंजाबी या चौघांना अटक केली. अटक झालेल्यांपैकी एका आरोपीचे संबंध सत्ताधारी राजकीय पक्षाशी असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

उल्हासनगरातील राहुलनगर परिसरातील रहिवासी राजविंदर सिंह यांनी ग्रेटर नोएडाच्या जेवर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, मार्च २०२५ मध्ये त्यांनी त्यांच्याकडे काम करणारे विक्की काटेजा आणि संतोष चौहान यांना लखनऊ येथील एका मित्राकडून मौल्यवान वस्तू आणण्यासाठी पाठवले होते. १० मार्च रोजी दोघे आलमबाग येथून दिल्लीकडे जाणाऱ्या शयनयान बसमध्ये प्रवास करत असताना कोट्यवधी रुपयांचे सोने, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू असलेली काळ्या रंगाची बॅग गायब झाली. याप्रकरणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नोएडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Thane : ना आरोपपत्र, ना पीडितांना भरपाई; मुंब्रा रेल्वे अपघाताचे एक वर्ष, जखमी प्रवाशांनी गमावली नोकरी, झाले कर्जबाजारी

Mumbai : पावसाळ्यात मेट्रो सज्ज; MMRDA ची एआय-आधारित पेन्टाेग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित

Jammu-Kashmir : ‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य

मुंबई एअरपोर्टवर CISF महिला जवानांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ; CPR देत वाचवला प्रवासी महिलेचा जीव, Video

यूएनमध्ये भारताचा पाकिस्तानवर हल्ला; नरसंहाराला लष्करी कारवाईचे नाव देऊन गुन्हेगारांचे पाप धुतले जात नाही