लखनऊ-मुंबई प्रवासात सोन्याची बॅग गायब; तपासाचे धागेदोरे उल्हासनगरात, चार अटकेत 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

लखनऊ-मुंबई प्रवासात सोन्याची बॅग गायब; तपासाचे धागेदोरे उल्हासनगरात, चार अटकेत

लखनऊ-मुंबई प्रवासात सोन्याने भरलेली बॅग गायब झाली होती. आठ महिन्यांच्या तपासानंतर उल्हासनगरमधील चौघांना अटक झाली. आता चौघांना जामीन झाला आहेे.

Swapnil S

उल्हासनगर : लखनऊ-मुंबई प्रवासात सोन्याने भरलेली बॅग गायब झाली होती. आठ महिन्यांच्या तपासानंतर उल्हासनगरमधील चौघांना अटक झाली. आता चौघांना जामीन झाला आहेे.

नोएडा पोलिसांचे विशेष पथक सोमवारी मध्यरात्री शहरात दाखल झाले. विठ्ठलवाडी पोलिसांच्या मदतीने नोएडा पोलिसांनी हायप्रोफाईल परिवारांतील भाविषा राजानी, संतोष चौहान, धीरज लालचंदानी आणि कमल पंजाबी या चौघांना अटक केली. अटक झालेल्यांपैकी एका आरोपीचे संबंध सत्ताधारी राजकीय पक्षाशी असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

उल्हासनगरातील राहुलनगर परिसरातील रहिवासी राजविंदर सिंह यांनी ग्रेटर नोएडाच्या जेवर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, मार्च २०२५ मध्ये त्यांनी त्यांच्याकडे काम करणारे विक्की काटेजा आणि संतोष चौहान यांना लखनऊ येथील एका मित्राकडून मौल्यवान वस्तू आणण्यासाठी पाठवले होते. १० मार्च रोजी दोघे आलमबाग येथून दिल्लीकडे जाणाऱ्या शयनयान बसमध्ये प्रवास करत असताना कोट्यवधी रुपयांचे सोने, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू असलेली काळ्या रंगाची बॅग गायब झाली. याप्रकरणी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नोएडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार