ठाणे

ठाणे महापालिकेच्या केवळ दिवा प्रभागामध्येच एका नगरसेवकाची वाढ कशी झाली?

प्रतिनिधी

ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभाग रचनेत विशिष्ट पक्षाला अनुकूल भूमिका घेतली गेली आहे. महापालिकेच्या ४७ प्रभागांपैकी २१ मधील लोकसंख्येत बदल केले असताना, केवळ दिवा येथे प्रभागामध्येच एका नगरसेवकाची वाढ कशी झाली, असा सवाल भाजपाचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे.

यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून फेब्रुवारीमध्ये प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील केवळ १८ टक्के लोकसंख्या असलेल्या मुंब्रा येथे ४ प्रभाग वाढविले होते. तर ८२ टक्के प्रभाग असलेल्या ठाण्यात ७ नगरसेवक वाढले होते. त्यात वागळे इस्टेटमधील पाच जागांचा समावेश होता. या प्रभागरचनेला भाजपने आक्षेप घेतला होता. आता दुसऱ्या वेळी प्रभागरचना नि:ष्पक्षपातीपणे होण्याची अपेक्षा होती. मात्र, या वेळीही विशिष्ट पक्षाला अनुकूल भूमिका घेतली गेली आहे. अचानकपणे दिवा येथील प्रभाग ५७ हजार लोकसंख्येवरून ३५ हजारांपर्यंत कमी केला गेला. तर मुंब्रा येथील प्रभाग ३६ हजारांवरून ४९ हजारांचा झाला.

जुन्या प्रभाग रचनेत मुंब्र्यातील दोन प्रभागांमध्ये ७१ हजार लोकसंख्या होती. आता नव्या रचनेत ती ८० हजारांवर पोचली गेली. घोडबंदर रोडवर लोकसंख्या वाढत आहे. मात्र, या ठिकाणी एकही नगरसेवक वाढला नाही, याबद्दल माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. केवळ दिवा परिसरातच नगरसेवक कसा वाढला, याकडे डुंबरे यांनी लक्ष वेधले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत