ठाणे

ठाणे महापालिकेच्या केवळ दिवा प्रभागामध्येच एका नगरसेवकाची वाढ कशी झाली?

प्रतिनिधी

ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभाग रचनेत विशिष्ट पक्षाला अनुकूल भूमिका घेतली गेली आहे. महापालिकेच्या ४७ प्रभागांपैकी २१ मधील लोकसंख्येत बदल केले असताना, केवळ दिवा येथे प्रभागामध्येच एका नगरसेवकाची वाढ कशी झाली, असा सवाल भाजपाचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे.

यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून फेब्रुवारीमध्ये प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील केवळ १८ टक्के लोकसंख्या असलेल्या मुंब्रा येथे ४ प्रभाग वाढविले होते. तर ८२ टक्के प्रभाग असलेल्या ठाण्यात ७ नगरसेवक वाढले होते. त्यात वागळे इस्टेटमधील पाच जागांचा समावेश होता. या प्रभागरचनेला भाजपने आक्षेप घेतला होता. आता दुसऱ्या वेळी प्रभागरचना नि:ष्पक्षपातीपणे होण्याची अपेक्षा होती. मात्र, या वेळीही विशिष्ट पक्षाला अनुकूल भूमिका घेतली गेली आहे. अचानकपणे दिवा येथील प्रभाग ५७ हजार लोकसंख्येवरून ३५ हजारांपर्यंत कमी केला गेला. तर मुंब्रा येथील प्रभाग ३६ हजारांवरून ४९ हजारांचा झाला.

जुन्या प्रभाग रचनेत मुंब्र्यातील दोन प्रभागांमध्ये ७१ हजार लोकसंख्या होती. आता नव्या रचनेत ती ८० हजारांवर पोचली गेली. घोडबंदर रोडवर लोकसंख्या वाढत आहे. मात्र, या ठिकाणी एकही नगरसेवक वाढला नाही, याबद्दल माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. केवळ दिवा परिसरातच नगरसेवक कसा वाढला, याकडे डुंबरे यांनी लक्ष वेधले.

तपासणी, निदान अन् वेळीच उपचार; प्राथमिक ते तृतीयस्तरीय आरोग्यसेवेचे बळकटीकरण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला ‘प्रगती’चा बूस्टर

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची संगणकाला पसंती; २८ हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वाधिक ६४,८२२ प्रवेश

न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन; समान कामासाठी समान वेतन व उच्च न्यायालयाप्रमाणे वेतनश्रेणी वाढीची मागणी

चंद्रा हवेत, चंद्रा नकोत; टाटा सन्सची मान्यता, टाटा ट्रस्टचा विरोध, शेअर बाजारात नोंदणी प्रक्रिया सुरू करणार