ठाणे

रस्ता रुंदीकरणातील बाधितांचे पुनर्वसन न झाल्याने आमरण उपोषण

बाजारपेठ रस्ता रुंदीकरणातील बाधितांना उच्च न्यायालयाने २३ वर्षांपूर्वी आदेशित करूनही महापालिकेने अद्यापही पुनर्वसन दिलेले नाही

Swapnil S

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाले असून हे रस्ता रुंदीकरण करताना अनेक घरे, दुकाने बाधित झाली आहेत; मात्र या बाधितांचे पुनर्वसन न झाल्याने जागरूक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. बाजारपेठ रस्ता रुंदीकरणांतील बंधितांसाठी जागरूक नागरिक फाऊंडेशनचे श्रीनिवास घाणेकर आणि दक्षता पोलीस चौकी ते वनश्री सृष्टी रस्ता रुंदीकरणांमध्ये दुकान बाधित राम बनसोडे आणि इतर बाधित केडीएमसी मुख्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

बाजारपेठ रस्ता रुंदीकरणातील बाधितांना उच्च न्यायालयाने २३ वर्षांपूर्वी आदेशित करूनही महापालिकेने अद्यापही पुनर्वसन दिलेले नाही. तसेच तत्कालीन महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे व विद्यमान आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यांना विविध विषयावर ३७ पत्र देऊन सुद्धा महापालिका त्यावर कोणतीही सकारात्मक भूमिका घेत नाही. डिसेंबर २०२२ मध्ये जागरूक नागरिक फाऊंडेशनने उपस्थित केलेल्या नऊ जनहितार्थ मुद्द्यावर महापालिकेने लेखी आश्वासन देऊनही अद्यापही कोणतीही अंमलबजावणी केली नाही. याचा निषेध म्हणून तसे या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत जागरूक नागरिक फाऊंडेशनचे कार्यकर्ते सोमवारपासून महापालिकेच्या भवना बाहेरच्या पदपथावर आमरण उपोषणास बसले आहेत.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी