ठाणे

उरण तालुक्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहतूकीला प्रचंड अडथळा

रस्त्यांची दुरूस्ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी न झाल्याने त्यावर खड्डयांचे प्रमाण अधिक वाढल्याचे नागरिकांनी म्हटले आहे

वृत्तसंस्था

उरण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूकीला प्रचंड अडथळा होत असल्यामुळे नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. उरण तालुक्यात प्रामुख्याने ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले होते त्याच ठिकाणी अधिक प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात केबल, पाईपलाईन यासाठी रस्ते खोदण्यात आले होते, मात्र त्यानंतर खोदलेल्या रस्त्यांची दुरूस्ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी न झाल्याने त्यावर खड्डयांचे प्रमाण अधिक वाढल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांबाबत सर्व प्राधिकरणांना ताबडतोब खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र उरण तालुक्यातील खड्ड्यांकडे कुठल्याही प्राधिकरणाने लक्ष न दिल्यामुळे खड्डयांच्या त्रासाला नागिरकांना सामोरे जावे लागत आहे. उरण तालुक्यातील नवघर ते बोकडविरा या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास