ठाणे

उरण तालुक्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहतूकीला प्रचंड अडथळा

वृत्तसंस्था

उरण तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूकीला प्रचंड अडथळा होत असल्यामुळे नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. उरण तालुक्यात प्रामुख्याने ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले होते त्याच ठिकाणी अधिक प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात केबल, पाईपलाईन यासाठी रस्ते खोदण्यात आले होते, मात्र त्यानंतर खोदलेल्या रस्त्यांची दुरूस्ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी न झाल्याने त्यावर खड्डयांचे प्रमाण अधिक वाढल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांबाबत सर्व प्राधिकरणांना ताबडतोब खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र उरण तालुक्यातील खड्ड्यांकडे कुठल्याही प्राधिकरणाने लक्ष न दिल्यामुळे खड्डयांच्या त्रासाला नागिरकांना सामोरे जावे लागत आहे. उरण तालुक्यातील नवघर ते बोकडविरा या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम