ठाणे

Jitendra Awhad : अखेर वकिलांच्या युक्तिवादानंतर जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर, पण...

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अखेर ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर त्यांच्यासह इतर १२ जणांनादेखील जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा चालू शो बंद पाडण्यात आला. यावेळी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षक मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चालू असलेला शो बंद पाडला. यावेळी तिथे एका प्रेक्षकाला मारहाणदेखील केली. त्यानंतर त्यांना ठाणे पोलिसांकडून अटक झाली आणि आज १२ नोव्हेंबरला त्यांना ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. ठाणे कोर्टात दोन्ही वकिलांमध्ये झालेल्या युक्तिवादानंतर जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, त्यानंतर लगेचच जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग