ठाणे

Jitendra Awhad : अखेर वकिलांच्या युक्तिवादानंतर जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर, पण...

अखेर एक रात्र पोलीस ठाण्यात काढल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना ठाणे कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अखेर ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर त्यांच्यासह इतर १२ जणांनादेखील जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा चालू शो बंद पाडण्यात आला. यावेळी त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षक मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चालू असलेला शो बंद पाडला. यावेळी तिथे एका प्रेक्षकाला मारहाणदेखील केली. त्यानंतर त्यांना ठाणे पोलिसांकडून अटक झाली आणि आज १२ नोव्हेंबरला त्यांना ठाणे कोर्टात हजर करण्यात आले. ठाणे कोर्टात दोन्ही वकिलांमध्ये झालेल्या युक्तिवादानंतर जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, त्यानंतर लगेचच जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत