ठाणे

शेतात काम करताना मुलाचा विजेच्या तारेला स्पर्श, वाचवायला धावलेल्या आईचाही शॉक लागून मृत्यू

Swapnil S

पालघर : रानडुकरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना बोईसरजवळील शिगाव-खुताड गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. ओमप्रकाश सहानी (३५) व ललिता सहानी (५५) अशी मृतांची नावे आहेत.

बोईसरजवळील शिगाव-खुताड येथे असलेल्या मिरचीच्या वाडीमध्ये एक परप्रांतीय कुटुंब काम करत होते. त्या वाडीत शेतीचे रानडुकरांपासून संरक्षण व्हावे यासाठी विजेची तार कुंपणाला लावली होती. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मुलगा ओमप्रकाश कन्हैया सहानी (३५) आणि त्याला वाचवायला गेलेली त्याची आई ललितादेवी सहानी (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. हे मूळचे बिहार राज्यातील होते. शेती व वाडीचे रानडुकरांपासून संरक्षण व्हावे यासाठी कुंपणाला लावलेल्या बेकायदा विद्युत प्रवाहाने याआधीही पालघर येथील नंडोरे येथे अशाच एका घटनेत दोघांचा बळी गेला होता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस