ठाणे

शेतात काम करताना मुलाचा विजेच्या तारेला स्पर्श, वाचवायला धावलेल्या आईचाही शॉक लागून मृत्यू

रानडुकरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मायलेकाचा मृत्यू

Swapnil S

पालघर : रानडुकरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, यासाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना बोईसरजवळील शिगाव-खुताड गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. ओमप्रकाश सहानी (३५) व ललिता सहानी (५५) अशी मृतांची नावे आहेत.

बोईसरजवळील शिगाव-खुताड येथे असलेल्या मिरचीच्या वाडीमध्ये एक परप्रांतीय कुटुंब काम करत होते. त्या वाडीत शेतीचे रानडुकरांपासून संरक्षण व्हावे यासाठी विजेची तार कुंपणाला लावली होती. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मुलगा ओमप्रकाश कन्हैया सहानी (३५) आणि त्याला वाचवायला गेलेली त्याची आई ललितादेवी सहानी (५५) यांचा जागीच मृत्यू झाला. हे मूळचे बिहार राज्यातील होते. शेती व वाडीचे रानडुकरांपासून संरक्षण व्हावे यासाठी कुंपणाला लावलेल्या बेकायदा विद्युत प्रवाहाने याआधीही पालघर येथील नंडोरे येथे अशाच एका घटनेत दोघांचा बळी गेला होता.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल

१ ऑगस्टपासून ‘ईएलआय’ लागू होणार; दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणार; योजनेला केंद्र सरकारची मंजुरी