संग्रहित छायाचित्र
ठाणे

मुरबाडमध्ये गावांचा संपर्क तुटला; अतिवृष्टीमुळे काळू, शाई नदीसह डोईफोडीलाही आला महापूर, आपत्तीव्यवस्थापनाचा रेड अलर्ट

मुरबाड तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसाने तालुक्यातील काळू, शाई, कणकविरा, मुरबाडी नदीसह डोईफोडीलाही महापूर आला असून अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद होऊन गावांचा संपर्क तुटला आहे.

Swapnil S

मुरबाड : मुरबाड तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसाने तालुक्यातील काळू, शाई, कणकविरा, मुरबाडी नदीसह डोईफोडीलाही महापूर आला असून अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद होऊन गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाच्या वतीने रेड अलर्ट जारी करत धोक्याच्या सूचना देऊन नदी, नाले, गडकिल्ले, तलाव, धरणांना पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

दोन जूलैपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून करचोंडे, घोरले, चिखले, चासोळे येथील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांचा संपर्क तालुक्यापासून तुटला आहे. सोबत काळू नदीची पातळी वाढली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क करण्यात आले असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस अतिवृष्टी होणार असून ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तहसीलदारांनी केली पाहणी

मुरबाड तालुक्यातील अनेक पूल पाण्यात गेले आहेत. त्याची पाहणी मुरबाडचे तसीलदार अभिजीत देशमुख यांनी करून पूरस्थितीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी नदीपात्रालगतच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या वाड्या-पाड्यांना भेट दिली तसेच नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रात आणीबाणी जाहीर करा; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

नागरिकांच्या मृत्यूनंतरच BMC जागी होणार का? मॅनहोल्सप्रकरणी मुंबई हायकोर्टाने फटकारले; पालिकेचे प्रतिज्ञापत्र केवळ धूळफेक

उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा! मुंबई, ठाणेमध्ये शाळा आजही बंद; राज्यात विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत १३ जणांचा बळी, तर ४ जण जखमी

नाशिकला आज ढगफुटीचा इशारा

Taj Mahal Survey : ताजमहालप्रकरणी प्रतिज्ञापत्राचे आदेश