ठाणे

Jitendra Awhad : फाशी झाली तरी चालेल, पण... ; जामीनानंतर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विवियाना मॉल मारहाण प्रकरणात ठाणे कोर्टातून जामिनावर सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. "फाशी झाली तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही" या भूमिकेवर ते ठाम आहेत. तर, 'माझ्या अटकेवेळी पोलिसांची हतबलता दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराजांची होणारी बदनामी रोखण्याचा आम्ही गुन्हा केला का? असा सवाल त्यांनी विचारला.

"छत्रपती शिवाजी महाराजांना नरसिंहाच्या अवतार दाखवल्याने त्यांच्या चातुर्याला धक्का लागला आहे. महिलांचा बाजार भरत होता, असा खोटा इतिहास हर हर महादेव चिटपटात दाखवला आहे. याचे काहीच ऐतिहासिक पुरावे नाही, असे सांगताना महाराजांनी माणसांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तरीही तसे दाखविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासला धक्का लागत आहे. बाजूप्रभू त्यांच्या विरोधात होते हे दाखवत बाजीप्रभू देशपांडेच्या इतिहासाला धक्का लावत आहेत." असे आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले आहेत.

पुढे जितेंद्र आव्हाड यांनी आरोप करताना म्हंटले की, "महाराष्ट्राला दाखविण्यासाठी घाईगडबडीने अटक करण्यात आली. आम्ही काहीही करू शकतो हे दाखविण्यासाठी आम्हाला अटक करण्यात आली. आम्हाला काल पोलिस ठाण्यात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. प्रेक्षकाला आम्ही मारहाण केली नाही, हे त्यानेच स्पष्ट केले. तरीही मला अटक करण्यात आली, यामागे कोण आहे. हे स्पष्ट करण्याची गरज नाही ते सर्वांना माहिती आहे. पोलिसांचा यात काहीच दोष नाही त्यांच्यावर दबाव होता,"

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?