ठाणे

अत्यल्प पाऊसामुळे रानसई धरण आटले,पाणी जपून वापरा असे आवाहन

गेल्यावर्षी रानसई धरणात या दरम्यान ५०७ मीमी पाऊस पडला होता आणि धरणातील पाण्याची पातळी १०२.०६ फूट होती

राजकुमार भगत

उरण तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण आटले असून फक्त २जुलै पर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असून उरणकरांना सध्या मृत (राखीव) साठ्यातून पाणी पुरवठा सूरू आहे. रानसई धरण परिसरात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन एमआयडीसी कडून करण्यात येत आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठी खूप कमी आहे. गेल्यावर्षी रानसई धरणात या दरम्यान ५०७ मीमी पाऊस पडला होता आणि धरणातील पाण्याची पातळी १०२.०६ फूट होती आणि धरणातील पाणीसाठा ५एमसीएम पर्यंत होता. मात्र यावर्षी धरणात फक्त ७० मीमी पाऊस झाला असून पाण्याची पातळी ८४.११ फुट असून १.४० एमसीएम पाणीसाठा शिल्लक आहे.

उरण तालुक्याला रोज ३५एमलडी पाण्याची गरज लागते. त्यापैकी ३ एमएलडी पाणी रानसई धरणातून घेतले जाते. तर, रोज ७ एमएलडी पाणी सिडको कडून विकत घेऊन उरण करांची गरज भागवली जाते. सुमारे ६.८ चौरस किलोमीटर क्षेत्रात हे धरण आहे. या धरणात दहा मिलियन क्यूबिक मिटर पाणीसाठविण्याची क्षमता आहे.

येत्या ५-६ दिवसात पाऊस झाला नाही तर रानसई धरणातील सर्व पाणी संपणार आहे आणि पाणी टंचाई भासणार आहे. त्यामुळे ही पाण्याची उणीव भरून कशी काढणार असा सवाल विचारण्यात येत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली