ठाणे

डोंबिवलीत रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू

रील करताना अपघात झाला असल्याची शक्यता तपासली जात आहे

शंकर जाधव

येथे रेल्वे अपघात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, सायंकाळी घडली. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग उत्तेकर (२४) आणि चेतन गोगावले (२२) अशी रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली येथे राहणारे होते. या अपघातात तरुणाचा मोबाईल फुटला असल्याने रील करताना अपघात झाला असल्याची शक्यता तपासली जात आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत