ठाणे

डोंबिवलीत रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू

रील करताना अपघात झाला असल्याची शक्यता तपासली जात आहे

शंकर जाधव

येथे रेल्वे अपघात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी, सायंकाळी घडली. या अपघाताची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग उत्तेकर (२४) आणि चेतन गोगावले (२२) अशी रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली येथे राहणारे होते. या अपघातात तरुणाचा मोबाईल फुटला असल्याने रील करताना अपघात झाला असल्याची शक्यता तपासली जात आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत