ठाणे

पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी राजाच्या आशा पल्लवित झाल्या

पावसाच्या पाण्यावर आणि पारंपरिक पद्धतीने आजही स्थानिक शेतकरी शेती करीत आहेत.

प्रतिनिधी

उन्हाचा तडाखा संपून आता पावसाच्या सरी बरसल्याने जव्हार तालुक्यातील लहान थोरांपासून वृक्ष वेली आणि जनावरे देखील आनंदून न्हाली आहेत. तालुक्यातील बळीराजा शेतकरी शेतकामाच्या घाईला आता जुटला आहे. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी राजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत तालुक्यात नांगरणीच्या कामाला आता वेग येणार आहे.

पावसाच्या पाण्यावर आणि पारंपरिक पद्धतीने आजही स्थानिक शेतकरी शेती करीत आहेत. तालुक्यात पावसाने समाधान कारक हजेरी लावल्याने बळी राजा आनंदून जाऊन शेतीच्या कामास प्रारंभ केला आहे. सध्यस्थितीत नांगरणीची कामे सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ८५,८०६ हेक्टर त्यापैकी ७ हजार हेक्टर भातपिकासाठी असून नागली- ४९०० हेक्टर, वरई४३०० हेक्टर, कडधान्य २४०३ हेक्टर व गळीतधान्य- ८४३ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तालुक्यातील सरासरी २५०० ते ३००० मि.मी. इतके पर्जन्यमान आहे. पावसाळाभर शेती करून त्यातून आलेल्या पिकाच्या आधाराने वर्षभर खानापणाची व्यवस्था होत असते. मुख्य भात, पीक असल्याने हळवी आणि गरवी अशा दोन प्रकारची शेती या तालुक्यात करण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षांपासून भातपिकाला आवश्यक वातावणात बदल होत चालेला आहे. निसर्गाचा लहरीपणाने भात शेती दिवसेंदिवस धोक्यात आली त्यातच भरमसाठ महागाई आहे. महागाईने डोक वर काढल्याने गरीब शेतकरी शेती साहित्यामध्ये होणाऱ्या भाव वाढीने त्रस्त झाले आहेत. शेती करण्यासाठी येणारा खर्च व त्यातून मिळणारा अल्प नफा यामुळे शेती करणे तितकेचे पूर्वीप्रमाणे सोपे राहिलेले नाही. यावर्षी वरून राजा बळीराजाला साथ देईल, अशी आशा आहे.

नवरा, मुलगा किंवा मुलगी नसलेल्या महिलांनी खटले टाळण्यासाठी इच्छापत्र करावे ; सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन

"गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन"; पुण्यातील कोयतागँगचा व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सांगलीतल्या विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या; शिक्षकाच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल, सुसाईड नोट लिहून संपवली जीवनयात्रा

राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळमर्यादा लागू करता येईल का? सर्वोच्च न्यायालय आज देणार महत्त्वाचा निर्णय

Navi Mumbai: भाजप - शिंदे गटातील धुसफूस न्यायालयात, भाजप मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला आक्षेप