अक्षररंग

आयुष्याचे पान

मुलाने मग पैशासाठी शेतच काढले खणून, पावसाळ्यात म्हादूने त्यात बियाणे घेतले पेरून..

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

म्हादू आपला दिवसभर

शेतात असतो राबत,

त्याचा मुलगा आळशी

नुसताच बसतो खेळत..

एकदा काय झाले

म्हादू आजारी पडला,

शेतात जाता येईना

म्हणून आतल्याआत रडला..

उघडे बोडके शेत पाहून

म्हादू उदास होई,

मुलाला म्हणे शेती कर

मुलगा ऐकत नाही..

एकदा म्हादू म्हणाला

‘मुला, पैसे गेलेत संपून,

तुला हवे असेल तर

शेतात ठेवलेत पुरून..

मुलाने मग पैशासाठी

शेतच काढले खणून,

पावसाळ्यात म्हादूने त्यात

बियाणे घेतले पेरून..

काही दिवसांनी शेतातून

पीक तरारून आले,

तेच पीक विकून मुलाने

रग्गड पैसे कमावले..

म्हादू म्हणे मुलाला

‘हेच जमिनीतील धन’,

कष्टाचे मोल समजून घे

सफल होईल जीवन..

कष्टाविना जगणे व्यर्थ

याचे राहू दे भान,

कष्टातूनच फुलते मुला

आयुष्याचे ‘पान न् पान’..

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

eknathavhad23@gmail.com

११ रुपयांचा IV सेट तब्बल ३२५ रुपयांना! वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा, तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

EPFO वेतन मर्यादा आता २५ हजारांपर्यंत

यूजीसीचे नियम कायदा बनणार नाही - मोहन भागवत

पाणी संकटासाठी टंचाई कृती आराखडा; गावांची यादी तयार करण्याची सूचना