अक्षररंग

आयुष्याचे पान

मुलाने मग पैशासाठी शेतच काढले खणून, पावसाळ्यात म्हादूने त्यात बियाणे घेतले पेरून..

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

म्हादू आपला दिवसभर

शेतात असतो राबत,

त्याचा मुलगा आळशी

नुसताच बसतो खेळत..

एकदा काय झाले

म्हादू आजारी पडला,

शेतात जाता येईना

म्हणून आतल्याआत रडला..

उघडे बोडके शेत पाहून

म्हादू उदास होई,

मुलाला म्हणे शेती कर

मुलगा ऐकत नाही..

एकदा म्हादू म्हणाला

‘मुला, पैसे गेलेत संपून,

तुला हवे असेल तर

शेतात ठेवलेत पुरून..

मुलाने मग पैशासाठी

शेतच काढले खणून,

पावसाळ्यात म्हादूने त्यात

बियाणे घेतले पेरून..

काही दिवसांनी शेतातून

पीक तरारून आले,

तेच पीक विकून मुलाने

रग्गड पैसे कमावले..

म्हादू म्हणे मुलाला

‘हेच जमिनीतील धन’,

कष्टाचे मोल समजून घे

सफल होईल जीवन..

कष्टाविना जगणे व्यर्थ

याचे राहू दे भान,

कष्टातूनच फुलते मुला

आयुष्याचे ‘पान न् पान’..

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

eknathavhad23@gmail.com

२२ व्या वर्षी जगाचा निरोप; अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरीच संपवलं जीवन, पोलीस तपास सुरू

अन्नभेसळ करणाऱ्यांना FDA चा दणका; वसई-विरारमध्ये १८ दुकाने सील, लाखोंचा भेसळयुक्त माल जप्त

गळ्यात साखळदंड, अंगावर चटके; पतीच्या जाचातून सुटण्यासाठी महिलेची ६ किमी पायपीट, थेट पोलीस ठाणं गाठलं

रीलमध्ये हसत-नाचत होती, पण... अभिनेत्री संचिता उगलेने उचललं टोकाचं पाऊल; शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत

दिल्लीकरांना दिलासा! नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात