अक्षररंग

ठकास महाठक

पैसे घेऊन दिन गेला मिठाईच्या दुकानात, पेढ्यांचा भाव त्याने विचारला गाणे गात...

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

पैसे घेऊन दिन गेला
मिठाईच्या दुकानात
पेढ्यांचा भाव त्याने
विचारला गाणे गात

मिठाईवाला मिठाई म्हणे,
चारशे रुपये किलो
दिन म्हणाला,
‘मला द्या, फक्त पाव किलो’

मिठाईवाल्याने पाव किलो
दिनला दिली मिठाई
दिन म्हणे,
‘पाव किलोलाच कमी वाटते काही’

मिठाईवाला म्हणे,
‘जास्त ओझं नको तुला
म्हणून थोडी कमी दिली
कळले का रे मुला’

दिनने मग वीस रुपयांच्या
चारच दिल्या नोटा
मिठाईवाला म्हणे,
‘अरे, करू नकोस तोटा’

दिन म्हणे, ‘पैसे मोजायचा
त्रास तुमचा वाचवला
म्हणून वीसची एक नोट
कमी दिली तुम्हाला’

मिठाईवाला चिडून म्हणे,
‘माझ्यावर उलटवलास डाव’
दिन म्हणे, ‘जसाच तसा,
हाच माझा स्वभाव’

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड