बिझनेस

Car Flooding : पुराच्या पाण्यात कार अडकली तर काय करायचं? 'या' सोप्या टिप्सचा करा वापर

तुमचं वाहन पुरात अडकल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत नुकसान टाळण्यासाठी काय करावं? चला जाणून घेऊया.

Suraj Sakunde

मुंबई: देशात आणि राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत अनेक भागात पुराची शक्यता आहे. पावसाळ्यात पुरामुळे लोकांचे हाल होत असल्याच्या बातम्या दरवर्षी समोर येतात. त्याचवेळी पुरात वाहने वाहून गेल्याच्या घटनाही तुम्ही पाहिल्या असतील.

अशा परिस्थितीत तुमचं वाहन पुरात अडकल्यावर काय करावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपली कार पाण्यात बुडताना किंवा वाहून जाताना पाहणं, निश्चितच क्लेशदायी असतं. मात्र अशा परिस्थितीत घाबरणं टाळलं पाहिजे आणि शांतपणे यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या बाबतीतही अशी दुर्दैवी परिस्थिती कधी ओढवलीच, तर त्यावेळी काय करायचं हेच आपण पाहणार आहोत.

कार स्टार्ट करू नका: जेव्हा तुम्ही तुमची कार पाण्यात बुडलेली पाहाल तेव्हा कार सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. वाहन सुरू केल्याने एक्झॉस्ट पाईप ब्लॉक होऊ शकतो, त्यामुळं इंजिन आणि इलेक्ट्रिक पार्ट्स खराब होऊ शकतात.

हँडब्रेक लावा: पुराच्या वेळी सुरक्षित राहण्यासाठी, नेहमी हँडब्रेक लावा आणि वाहन गियरमध्ये ठेवा. तुम्ही वाहनाच्या टोइंग पॉइंटचा वापर करून ती झाड किंवा विद्युत खांबासारख्या मजबूत वस्तूला बांधू शकता, जेणेकरून ती वाहून जाणार नाही.

बॅटरी डिस्कनेक्ट करा : आपणा सर्वांना माहित आहे की पाण्यात विजेला स्पर्श करणे खूप धोकादायक आहे. अशा स्थितीत पुराच्या वेळी वाहनातही विद्युत उपकरणे (विद्युत उपकरणे) चालवणे धोकादायक आहे. त्यामुळे तुमच्या वाहनाची बॅटरी डिस्कनेक्ट करा.

यामुळे शॉर्ट सर्किट किंवा वाहनाच्या इलेक्ट्रिकल घटकांना कायमचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो. पुराच्या वेळी वाहनांच्या दुरुस्तीवर होणारा मोठा खर्च टाळण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे.

मेकॅनिकची मदत घ्या: तुमच्या वाहनाच्या नुकसानीचे अचूक निदान करण्यासाठी चांगल्या मेकॅनिकची मदत घ्या. तसेच, कोणतीही समस्या टाळण्यासाठी कार जवळच्या सर्व्हिस स्टेशनवर न्या.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास