मनोरंजन

Sushant Singh : तीन वर्ष उलटूनही सुशांतचे चाहते आणि कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत...

नवशक्ती Web Desk

आजचा दिवस मनोरंजन विश्वासाठी एका वेगळ्या आणि वाईट कारणांसाठी लक्षात आहे. तीन वर्षांपूर्वी 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री आणि चाहत्यांना धक्का बसला होता. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या केली, याचा तपास गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही पुरावा सीबीआयच्या हाती लागलेला नाही. खरे तर सीबीआयने या प्रकरणी अद्याप आरोपपत्रही दाखल केलेले नाही. त्यामुळे सुशांतचे असंख्य चाहते आणि कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

सुशांतच्या मृत्यूनंतर बिहार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आले. गेल्या तीन वर्षांच्या तपासानंतरही सीबीआय अद्याप आरोपपत्र दाखल करू शकलेली नाही किंवा खटला बंद करू शकलेली नाही. एवढेच नाही तर तपासाच्या व्याप्तीबाबतही सीबीआयने मौन बाळगले आहे. 2020 मध्ये, स्थानिक वांद्रे पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर त्यांनी अनेक कलाकार आणि निर्मात्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले.

"मोदी...तेवढी तुमची लायकी नाही..." नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांवर टीकास्त्र

पंतप्रधान मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज, पाहा काय म्हणाले?

"वाटेल त्याच्या डोक्यात जिरेटोप घालू नका..." उद्धव ठाकरेंनी प्रफुल पटेलांना सुनावलं

"हे व्होट जिहाद करतात..."नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा