मनोरंजन

''म्हणून झालं कोट्यवधींचं नुकसान'' , कंगना रनौतचं धक्कादायक विधान

नवशक्ती Web Desk

बॉलिवूडची 'कॉन्ट्रोवर्सी क्वीन' कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर परखडपणे आपली मतं मांडत असते. कंगना रनौत या वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आली आहे.

या परखडपणाचा कंगनाला मोठा फटका बसला आहे. तिचे 30 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले. स्वत: कंगनाने हा दावा केला आहे.

इंस्टाग्रामवर इलॉन मस्कची एक बातमी शेअर केली आहे. यात इलॉन मस्कने म्हटले आहे की, मला जे पाहिजे ते मी बोलेन, भले मला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. आता त्याच हे विधान शेअर करताना कंगनाने तिला झालेल्या आर्थिक नुकसानाबद्दल नेटकऱ्यांना सांगितलं आहे.

कंगना राणौतने दावा केला आहे की हिंदू धर्मासाठी आणि राजकारणी आणि देशद्रोही यांच्या विरोधात बोलण्यासाठी तिला 20-25 ब्रँड एंडोर्समेंट खर्च करावे लागले.

कंगना रनौतने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले की, 'हे खरे स्वातंत्र्य आणि यशाचे पात्र आहे. हिंदुत्वावर बोलणे, राजकारणी, देशद्रोही, तुकडे तुकडे गँग यांच्या विरोधात वक्तव्ये करणे याचा तोटा म्हणजे मला 20-25 ब्रँडच्या जाहिरातींमधून काढून टाकण्यात आले. त्यांनी मला एका रात्रीत काढून टाकले. यामुळे माझे दरवर्षाला 30 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले.'

का वाढेना मतदानाचा टक्का?

जपायला हवा, दाभोलकरांचा वारसा

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?