मनोरंजन

''म्हणून झालं कोट्यवधींचं नुकसान'' , कंगना रनौतचं धक्कादायक विधान

कॉन्ट्रोवर्सी क्वीन' कंगना रनौत पुन्हा चर्चेत

नवशक्ती Web Desk

बॉलिवूडची 'कॉन्ट्रोवर्सी क्वीन' कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर परखडपणे आपली मतं मांडत असते. कंगना रनौत या वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आली आहे.

या परखडपणाचा कंगनाला मोठा फटका बसला आहे. तिचे 30 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले. स्वत: कंगनाने हा दावा केला आहे.

इंस्टाग्रामवर इलॉन मस्कची एक बातमी शेअर केली आहे. यात इलॉन मस्कने म्हटले आहे की, मला जे पाहिजे ते मी बोलेन, भले मला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. आता त्याच हे विधान शेअर करताना कंगनाने तिला झालेल्या आर्थिक नुकसानाबद्दल नेटकऱ्यांना सांगितलं आहे.

कंगना राणौतने दावा केला आहे की हिंदू धर्मासाठी आणि राजकारणी आणि देशद्रोही यांच्या विरोधात बोलण्यासाठी तिला 20-25 ब्रँड एंडोर्समेंट खर्च करावे लागले.

कंगना रनौतने इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले की, 'हे खरे स्वातंत्र्य आणि यशाचे पात्र आहे. हिंदुत्वावर बोलणे, राजकारणी, देशद्रोही, तुकडे तुकडे गँग यांच्या विरोधात वक्तव्ये करणे याचा तोटा म्हणजे मला 20-25 ब्रँडच्या जाहिरातींमधून काढून टाकण्यात आले. त्यांनी मला एका रात्रीत काढून टाकले. यामुळे माझे दरवर्षाला 30 ते 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले.'

Navi Mumbai : अक्षय्य तृतीयानिमित्त एपीएमसीत आंब्याची विक्रमी आवक; ९४ हजार पेट्या दाखल, हापूस आंब्याचे दर काही प्रमाणात घसरले

धर्मांतराचे प्रकार खपवून घेऊ नका! देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश

Mumbai : अभियंत्यांच्या अंतर्गत बदलीसाठी समिती स्थापन; ऑनलाइन पद्धतीने आता बदली होणार

राहुल गांधींवरील 'त्या' मोठ्या कारवाईला ब्रेक; हायकोर्टाने स्वतःचाच आदेश बदलला

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे पुन्हा निर्बंध; अमेरिकेने कराराचा भंग केल्याचा आरोप