मनोरंजन

ममता बॅनर्जी यांनी 'द केरला स्टोरी' या चित्रपटावर राज्यात बंदी घातली

द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी, राज्यात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या

नवशक्ती Web Desk

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी 'द केरला स्टोरी' या वादग्रस्त चित्रपटावर राज्यात बंदी घातली आहे. मुख्य सचिव ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा चित्रपट रनिंग स्क्रीनवरून हटवण्याचे आदेश दिले. द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी, राज्यात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

'द केरला स्टोरी' 5 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “पूर्वी ते काश्मीरच्या फाईल्स घेऊन आले होते, आता ही केरळची गोष्ट आहे आणि नंतर बंगालच्या फाइल्सची योजना आखत आहेत. भाजप जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहे? केरला स्टोरी हा चित्रपट खोट्या तथ्यांद्वारे केरळला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी या त्यांच्या राज्यात 'द केरला स्टोरी' चित्रपटावर बंदी घालणाऱ्या दुसऱ्या बिगर-भाजप मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही चित्रपटाबाबत असाच आदेश जारी केला होता.

अटल पेन्शनचे केंद्रीकरण चिंताजनक; बँकांनी ग्राहकांना पेन्शन स्लॅबसाठी प्रवृत्त करावे - वित्तीय सेवा विभाग सचिव एम. नागराजू

मुंबईकरांसाठी खुशखबर! गोराईत महाराष्ट्रातील पहिल्या मँग्रोव्ह पार्कचं २८ मे रोजी उद्घाटन; पर्यावरण पर्यटनाला मिळणार चालना

Mumbai : वांद्र्यातील गरीब नगर पाडकाम ८५ टक्के पूर्ण; "मानवी दृष्टिकोन ठेवून कारवाई," पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण

नवी मुंबईत ५०४ इमारती धोकादायक; ५२ इमारती अतिधोकादायक; विभागवार सर्वेक्षणानंतर यादी जाहीर

वाढत्या तापमानामुळे कांदा सडतोय; कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त