मनोरंजन

मोठ्या पडद्यावर अवतरणार 'महाभारत'

नवशक्ती Web Desk

'बाहुबली', 'बाहुबली २', 'RRR' यांसारखे भव्य चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केले ते राजामौली यांचं नाव केवळ भारतातच नाही तर परदेशातही आता ओळखीचं झालं आहे. त्यांचा यापुढील सिनेमा कोणता असेल याची उत्सुकता सर्वांनाच होती. नुकतंच त्यांनी त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट काय आहे ते सांगितलं. राजामौली यांना 'महाभारत' मोठ्या पडद्यावर आणायचं आहे. ते महाभारत असं असेल ज्याची प्रेक्षकांनी कधीही कल्पना केली नसेल किंवा पाहिलं नसेल. दहा भागांमध्ये 'महाभारत' त्यांना आणायचं आहे.

एका मुलाखतीत याविषयी बोलताना राजामौली म्हणाले, “जर मी आज ‘महाभारत’ बनवायचा निर्णय घेतला तर त्यासंदर्भात मला वाचन करण्यात एक वर्षं जाईल. सध्या याबाबत बोलायचं झालं तर हा चित्रपट १० भागात बनू शकतो एवढा मोठा आहे.मी महाभारतासाठी जेव्हा पात्रं लिहिन ती तुम्ही आजवर पाहिलेल्या पात्रांप्रमाणे नसतील. मला माहीत आहे प्रेक्षकांनी आधीच कोणता कलाकार कोणतं पात्र साकारणार, याबद्दल चर्चा सुरू केली आहे. मी जेव्हा ती पात्रं लिहिन तेव्हाच याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकेन.”

निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

ऑनलाईन गेमची उलाढाल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

महिंद्राच्या 'या' नवीन SUV ची जबरदस्त क्रेझ! अवघ्या 1 तासात 50,000 हून अधिक गाड्यांचे बुकिंग! पाहा फीचर्स अन् किंमत

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास