इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यापाठोपाठ पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी काश्मीरचा उल्लेख करीत भारताविरुद्ध गरळ ओकली.
भारताने हल्ला करून चूक केली, परंतु पाकिस्तानने धैर्याने आणि संयमाने उत्तर दिले. जगाला हेही कळले की, पाकिस्तानला शांतता हवी आहे. मात्र, देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यास आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. आम्ही कोणाच्याही दबावापुढे झुकत नाही आणि कधीही झुकणार नाही. 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये पाकिस्तानचा पराभव झाला असला तरी झरदारी म्हणतात, पाकिस्तानने भारताविरुद्धच्या संघर्षात विजय मिळवला. या विजयाने आम्हाला आठवण करुन दिली की, सर्वजण एकत्रित आहोत, असे झरदारी यांनी म्हटल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.