आंतरराष्ट्रीय

वाद, मतभेद हे चर्चेने, राजनैतिक मार्गानेच सोडवावे - एस. जयशंकर

रशियातील कझान येथे सुरू असलेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी जयशंकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने बोलत होते.

Swapnil S

कझान : संघर्ष आणि तणावाच्या स्थितीवर तोडगा काढणे हीच काळाची मुख्य गरज आहे. वाद आणि मतभेदांवर चर्चेने आणि राजनैतिक स्तरावर मार्ग काढला पाहिजे आणि एकदा करार करण्यात आले की त्याचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी येथे केले.

रशियातील कझान येथे सुरू असलेल्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी जयशंकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने बोलत होते. आपण कठीण काळात भेटत आहोत. दीर्घकालीन आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जगाने नव्या विचाराने तयारी केली पाहिजे आणि आमची तसे करण्याची मानसिकता आहे हाच संदेश या परिषदेतून दिला गेला आहे, असेही जयशंकर म्हणाले.

सध्या युद्धाचे पर्व नाही, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले होते, त्याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले. संघर्ष आणि तणावाच्या स्थितीवर तोडगा काढणे हीच काळाची मुख्य गरज आहे. वाद आणि मतभेद सामोपचाराने मिटविले पाहिजेत आणि एकदा करार झाला की त्याचा मान राखला गेलाच पाहिजे, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

आंतरराष्ट्रीय कायद्याचे अपवाद वगळून पालन झाले पाहिजे, दहशतवादाला कोणत्याही स्थितीत थारा देण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले. शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवसाच्या सत्राला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ॲण्टोनिओ ग्युटेरर्स यांच्यासह २० हून अधिक जागतिक प्रतिनिधी हजर होते.

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा