आंतरराष्ट्रीय

सौदी अरेबियात उष्णतेचा कहर, १ हजारांपेक्षा जास्त हज यात्रेकरूंचा मृत्यू? अनेक भारतीयांनी गमावला जीव

सौदी अरेबियात कडक उन्हामुळे हज यात्रेला गेलेल्या १,००० हून अधिक यात्रेकरुंचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.

Suraj Sakunde

जगभरातील अनेक देशांमध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. सौदी अरेबियात कडक उन्हामुळे हज यात्रेला गेलेल्या १,००० हून अधिक यात्रेकरुंचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर येत आहे. या मृतांमध्ये ९० भारतीयांचाही समावेश आहे. या आठवड्यात मक्कामधील तापमान ५१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्याचा फटका हज यात्रेकरूंना बसला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

९० भारतीयांच्या मृत्यू?

जगभरातून लाखो मुस्लिम दरवर्षी हज करण्यासाठी मक्केला पोहोचतात. या वर्षी सुमारे १८ लाख लोक हज यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. यंदा भारतातून सुमारे दोन लाख लोकांनी हज यात्रेसाठी नोंदणी केली होती. मात्र उष्णतेच्या लाटेमुळे परिस्थिती बिकट बनली आहे. मक्का येथे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये ९० भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. याशिवाय अनेक यात्रेकरू बेपत्ता असून त्यांना शोधण्यात मोठी अडचण येत आहे. दरम्यान बेपत्ता हज यात्रेकरूंचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत.

मक्क्याचं तापमान वाढतंय...

हज हा इस्लामच्या पाच प्रमुख स्तंभांपैकी एक मानला जातो. आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिमानं आयुष्यात एकदा हज यात्रा करावी, असं मानलं जातं. अलीकडच्या काळात वातावरणातील बदलामुळे हज यात्रेवर गंभीर परिणाम होत आहे. हज क्षेत्राचं तापमान दर दशकात ०.४ अंश सेल्सिअसनं वाढत असल्याचं सौदी अरेबियाच्या एका संशोधनात म्हटलं आहे. सोमवारी मक्काच्या ग्रँड मशिदीजवळचे तापमान ५१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचलं, असं सौदीच्या हवामान खात्यानं सांगितले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा