बीजिंग : भारत-चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी व द्विपक्षीय सुधारण्यासाठी उभय देशांमध्ये बुधवारी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. यात कैलास-मानसरोवर यात्रा लवकरच सुरु करण्याची चीनने तयारी दर्शवली आहे. चीनच्या दौऱ्यावर गेलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चा ही झाली.
या बैठकीनंतर चीनने सांगितले की, भारतासोबत झालेल्या करारांची अंमलबजावणी केली जाईल. तर चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले की, दोन्ही देशांमधील मतभेद सोडवण्यासाठी चीन प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यास तयार आहे.
२०१९ नंतर पहिल्यांदाच भारताचे वरिष्ठ अधिकारी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बीजिंगचा दौरा केला होता.