भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चा ही झाली. एक्स
आंतरराष्ट्रीय

कैलास-मानसरोवर यात्रा लवकरच सुरु होणार

भारत-चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी व द्विपक्षीय सुधारण्यासाठी उभय देशांमध्ये बुधवारी अनेक मुद्यांवर चर्चा झाली.

Swapnil S

बीजिंग : भारत-चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी व द्विपक्षीय सुधारण्यासाठी उभय देशांमध्ये बुधवारी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. यात कैलास-मानसरोवर यात्रा लवकरच सुरु करण्याची चीनने तयारी दर्शवली आहे. चीनच्या दौऱ्यावर गेलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चा ही झाली.

या बैठकीनंतर चीनने सांगितले की, भारतासोबत झालेल्या करारांची अंमलबजावणी केली जाईल. तर चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले की, दोन्ही देशांमधील मतभेद सोडवण्यासाठी चीन प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यास तयार आहे.

२०१९ नंतर पहिल्यांदाच भारताचे वरिष्ठ अधिकारी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बीजिंगचा दौरा केला होता.

Thane : १५ जूनपासून महापालिका शाळांचे शैक्षणिक वर्ष प्रारंभ; प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे होणार उत्साहात स्वागत

यंदाचा एल निनो तीव्र रूप धारण करणार; तो भयंकर आणि खर्चिक ठरण्याची शास्त्रज्ञांना भीती

संगीत नाटक अकादमीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील दिग्गज व युवा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव

उकाडा, आर्द्रतेमुळे ठाणेकर हैराण; घामोळ्यांच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ

Mumbai : पुनर्भरणाची व्यवस्था करा! पावसाच्या पाण्याबाबत BMC आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश