आंतरराष्ट्रीय

मोदींच्या नेतृत्वामुळे सकारात्मक बदल; चीनने केले भारताचे कौतुक

मी भारताच्या दुसऱ्यांदा दौऱ्यावर गेलो. मी ४ वर्षांपूर्वी भारतात गेलो होतो. भारतात देशात व परदेशी नीती पूर्णपणे बदलली आहे.

Swapnil S

बीजिंग : भारत हा ताकदवान देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या आर्थिक व परदेश धोरणात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. भारत वेगाने पुढे जात आहे, असे कौतुक चीनने केले आहे.

‘ग्लोबल टाइम्स’ने फुडान विद्यापीठाचे सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीजचे संचालक झांग जियाडोंग यांचा लेख प्रसिद्ध झाला.

त्यात त्यांनी नमूद केले की, भारत हा आता रणनीतीरूपाने जास्त आत्मविश्वासाने भरला आहे. भारत आता मजबुतीने पुढे जात आहे. भारत हा जगासाठी महत्त्वाचा देश बनला आहे. जागतिक व्यापार, संस्कृती, अर्थशास्त्र व राजकारणासहित विविध क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने सर्वच क्षेत्रात आपला दृष्टिकोन व्यापक केला आहे, असे ते म्हणाले.

मी भारताच्या दुसऱ्यांदा दौऱ्यावर गेलो. मी ४ वर्षांपूर्वी भारतात गेलो होतो. भारतात देशात व परदेशी नीती पूर्णपणे बदलली आहे. भारताने आर्थिक विकास व सामाजिक शासनात चांगली कामगिरी केली. स्वप्नातून वास्तवतेला भिडणारे धोरण भारताने तयार केले, असे त्यांनी सांगितले.

प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या लोकल ट्रेन्सची खास 'हॉर्न सलामी'; रात्री १२ चा ठोका वाजताच CSMT वर जल्लोष; Video व्हायरल

साताऱ्यात ३३ वर्षांनंतर साहित्यिकांचा भव्य मेळा; ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन

चांदी जैसा रंग, सोने जैसा भाव...; मूल्य, परताव्याबाबत २०२५ मध्ये चांदीच ठरली सरस

न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा; निवडणुकीच्या कामाला स्थगिती; BMC आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर HC ची नाराजी