लाईफस्टाईल

नारळ पाणी प्यायल्याने 'हे' होतात फायदे

नारळामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत, नारळामध्ये जास्त प्रमाणात थंडावा असतो. तसेच तहान भागवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर हा केला जातो.

Rutuja Karpe

नारळ पाणी प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या कमी होतात. आपल्याकडे आजारी माणसाला नारळ पाणी दिलं जातं. नारळ पाणी म्हणजे एक सलाइनची बाटली येवढं गुणकारी असते असं म्हंटले जातं. त्यामुळे आपल्या शरीरासाठी नारळ पाणी हे फार फायदेशीर आहे. नारळामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत, नारळामध्ये जास्त प्रमाणात थंडावा असतो. तसेच तहान भागवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर हा केला जातो. अलाहादायक थंड पाण्याने आपल्या शरीराची पाण्याची गरज भागवणे याचे काम नारळाचे पाणी करते. तसेच त्याच्यामध्ये काही प्रमाणात मलाई असते. पांढरी मलाई सुद्धा लाभकारक आहे. नारळाचे पाणी जंतुसंसर्गीय नसते. ओल्या नारळामधले पाणी हे गोड तसेच काही प्रमाणात आंबट पण असते.

औषधी उपयोग —

नारळाचे पाणी हे कॉलरा या आजारामध्ये जास्त लाभकारक आहे. कारण त्या काळात जुलाब आणि उलट्या होऊन शरीरातील पाण्याची क्षमता हि पूर्ण कमी झालेली असते. त्यावेळी शरीरात कमी प्रमाणात क्षार उरतात. कमी प्रमाणात निर्माण झालेल्या क्षार मुळे शरीरामध्ये थकवा हा जास्त प्रमाणात जाणवतो. त्या वेळी नारळाचे पाणी पिल्याने शरीरात जे कॉलरा चे जंतू असतात ते सुद्धा नष्ट होण्यास मदत होते. कारण नारळाच्या पाण्यात कोणताच जंतू संसर्ग हा नसतो.

नारळाच्या पाण्यात जर तुम्ही लिंबू मिसळले तर त्यावेळी त्याच्यामध्ये असलेले ‘सी’ जीवन सत्वाचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. नारळाचे पाणी हि मूत्र साफ करण्यास सुद्धा मदत करते. मूत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात युरीन असते. अश्या वेळी ते शरीरातून बाहेर फेकण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर हा करावा . सर्वात महत्वाचे म्हणजे कोवळ्या नारळाच्या पाण्याचा वापर हा आहारात केला जावा.

"हॉटेलमध्ये बोलावले अन्..."; अल्पवयीन नेमबाज युवतीचा राष्ट्रीय प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

पर्यावरणासाठी झगडणारं नेतृत्व गमावलं! प्रख्यात पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांचं निधन

'मातोश्री'च्या अंगणात रंगणार प्रतिष्ठेची लढाई; वांद्रे-कलानगरमध्ये महिला उमेदवारांमध्ये 'सामना'

"आशेचा किरण..." म्हणत कतरिना-विकीने सांगितले बाळाचे नाव; 'उरी'शी आहे खास कनेक्शन? दिग्दर्शकाच्या कमेंटने वेधलं लक्ष...

आयोगाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप; जनहित याचिकेवर उद्या सुनावणी