लाईफस्टाईल

आल्याचे पाणी प्यायल्याने होतात ‘हे’ चमत्कारी फायदे

Rutuja Karpe

आले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आयुर्वेदामध्ये आल्याला अत्यंत गुणकारी आणि महत्त्वाचे मानले जाते. आलं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही आल्याचा नियमित आहारात समावेश केला, तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात

आल्यामध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. आले रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखते तसेच रिकाम्या पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून ही आराम मिळतो. यासोबतच हे तुमचे हृदय सुद्धा निरोगी ठेवते.

दररोज रिकाम्या पोटी आल्याचे पाणी प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका कमी होतो. आल्याचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने आपले शरीर डिटॉक्स होते. त्यामुळे शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकले जातात. तसेच आल्याचं पाणी आपली त्वचा स्वच्छ होण्यास मदत करते.याशिवाय याच्या सेवनाने चेहऱ्यावरील डाग व्रण आणि वांग कमी होतात

दररोज रिकाम्या पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती मजबूत होते
यासोबतच अपचन, गॅस, बद्धकोष्ठता,
उलट्या आणि सूज यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

आले एंटी इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे हे शरीरातील सूज कमी करण्यासाठी
देखील प्रभावी सिद्ध होऊ शकते. आले जंतू आणि हानिकारक जीवाणूंशी लढण्यासाठी प्रभावी मानले जाते.

Note : या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. याचे व्यक्तिनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस