Freepik
लाईफस्टाईल

Chankya Niti: पुरुषांनी 'या' गोष्टी नेहमी गुप्त ठेवाव्यात, जाणून घ्या चाणक्य नीती

Tejashree Gaikwad

Chanakya Niti in Marathi: आचार्य चाणक्य यांना प्रत्येक भारतीय ओळखतो. ते एक महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. त्यांनी चाणक्य नीती लिहली. त्यांनी स्वतःच्या जीवनाच्या अनुभवावरून आणि त्याच्या ज्ञानाच्या आधारे त्यांनी ही चाणक्य नीती लिहली. या चाणक्य नीतीच्या आधारे एखादी व्यक्ती आनंदी, समृद्ध आणि बॅलेन्स जीवन जगू शकेल. चाणक्य यांनी प्रत्येक क्षेत्राबद्दल त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे. चला चाणक्यांकडून जाणून घेऊयात की पुरुषांनी नेहमी कोणत्या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजेत.

पैशाशी संबंधित गोष्टी

पैसा हा किती गरजेचा आहे. पैसा आपल्याला सक्षम बनवतो. आजच्या काळात पैसा ही शक्ती आहे. याचमुळे पुरुषांनी तुमची आर्थिक परिस्थिती किंवा पैशाशी संबंधित कोणत्याही गोष्टी, समस्या कोणालाही सांगू नये. कारण अशा गोष्टी सांगितल्या की समाजात तुमचा आदर कमी होतो. यासोबतच जेव्हा लोकांना समजत की तुमच्याकडे पैशांची कमतरता आहे, तेव्हा ते तुमच्या या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात.

कौटुंबिक किंवा घराशी संबंधित गोष्टी

पुरुषांनी कधीही बाहेरच्या लोकांना कौटुंबिक वाद किंवा घराशी संबंधित कोणत्याही गोष्टी सांगू नये. यासोबतच पत्नीबद्दलही माहिती सांगू नये. या गोष्टी तुम्ही शेअर केल्यास समोरचा त्याचा फायदा घेऊ शकतो. याचे परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागू शकतात.

स्वतःचा झालेला अपमान

जर कधी एखाद्या गोष्टीमुळे तुमचा अपमान झाला असेल तर अशा गोष्टी कोणाशीही जोक म्हणूनही शेअर करू नका. सहसा मस्ती आणि जोकच्या मूडमध्ये अशा गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगतात. पण अशा गोष्टी जितक्या जास्त गुप्त ठेवाल तितकं चांगलं. म्हणून, जर तुम्ही कधीही अपमानाचे कडू घोट प्यायला असाल तर ते तुमच्या जवळच ठेवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही गृहीतके आणि सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' समर्थन किंवा पुष्टी करत नाही.)

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस