Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार प्रातिनिधिक छायाचित्र
लाईफस्टाईल

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

आजपासून नवीन SIM घेताना पडताळणीची नवी प्रक्रिया सुरू होत आहे. एका व्यक्तीच्या नावावर किती SIM ठेवता येतात, फोटोवरून तपासणी कशी होणार आणि नंबरची मर्यादा ओलांडल्यास काय होईल, जाणून घ्या.

Mayuri Gawade

तुमच्या नावावर एकापेक्षा जास्त मोबाइल नंबर आहेत का? किंवा नवीन सिम कार्ड घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज, २४ ऑगस्टपासून नवीन सिम देताना ग्राहकांची पडताळणी करण्याची नवी प्रक्रिया सुरू होत आहे. एका व्यक्तीच्या नावावर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त मोबाइल कनेक्शन जाऊ नयेत, यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) टेलिकॉम कंपन्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, यापुढे ग्राहकाच्या फोटोचाही पडताळणीसाठी वापर केला जाणार आहे.

एका व्यक्तीच्या नावावर किती नंबर?

दूरसंचार विभागाच्या नियमानुसार, एका व्यक्तीच्या नावावर देशभरातील सर्व टेलिकॉम कंपन्यांचे मिळून जास्तीत जास्त ९ मोबाइल कनेक्शन ठेवता येतात. म्हणजेच जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया किंवा बीएसएनएल अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे नंबर असले, तरी त्यांची एकत्रित संख्या मोजली जाते.

उदाहरणार्थ, तुमच्या नावावर जिओचे ४, एअरटेलचे ३ आणि बीएसएनएलचे २ नंबर असतील, तर एकूण ९ मोबाइल कनेक्शन झाले. अशा परिस्थितीत आणखी नवीन सिम घेता येणार नाही.

जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील संबंधित सेवा क्षेत्रांमध्ये मात्र ही मर्यादा ६ मोबाइल कनेक्शनची आहे.

९ नंबर पूर्ण झाले तर पुढे काय?

एखाद्या ग्राहकाच्या नावावर आधीच ९ मोबाइल कनेक्शन असतील आणि तो आणखी एक नवीन सिम घेण्यासाठी गेला, तर त्याची पडताळणी केली जाणार आहे. यासाठी दूरसंचार विभागाच्या डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचा (DIP) वापर केला जाईल.

२३ ऑगस्टपासून ज्या ग्राहकांच्या नावावर ९ मोबाइल कनेक्शन पूर्ण झाली आहेत, त्यांचे फोटो DIP च्या माध्यमातून टेलिकॉम कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. टेलिकॉम कंपन्या ही माहिती नियमितपणे घेऊन नवीन सिमसाठी आलेल्या ग्राहकाची ओळख पटवतील.

नवीन SIM घेताना फोटोवरून पडताळणी

२४ ऑगस्टपासून अशा ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि संस्थात्मक व्यवस्था करण्याचे निर्देश टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावावर आधीच परवानगीची कमाल ९ कनेक्शन असल्याचे आढळल्यास, त्याला आणखी नवीन मोबाइल कनेक्शन देता येणार नाही.

सुरुवातीच्या टप्प्यात ही तपासणी डी+१ म्हणजे पुढील दिवशी केली जाऊ शकते. मात्र, नवीन सिमची नोंदणी आणि ॲक्टिव्हेशन करतानाच ही तपासणी रिअल-टाइममध्ये व्हावी, अशी व्यवस्था ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत तयार करण्याचे निर्देश आहेत.

चुकून अतिरिक्त SIM सुरू झाला तर?

रिअल-टाइम व्यवस्था पूर्णपणे लागू होईपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या नावावर मर्यादेपेक्षा जास्त सिम सक्रिय झाल्याचे आढळल्यास, संबंधित अतिरिक्त कनेक्शनवर कारवाई होऊ शकते. नियमांनुसार आवश्यक पडताळणी पूर्ण होईपर्यंत ते कनेक्शन निलंबित केले जाऊ शकते.

आधीपासून ९ पेक्षा जास्त नंबर असतील तर?

एखाद्या व्यक्तीच्या नावावर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त मोबाइल कनेक्शन आधीपासूनच असतील, तर अतिरिक्त नंबरबाबत दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार कारवाई केली जाऊ शकते. अशावेळी परवानगीच्या मर्यादेपेक्षा जास्त असलेले किंवा गरज नसलेले नंबर बंद करण्याची प्रक्रिया करावी लागू शकते.

या नव्या व्यवस्थेचा अर्थ असा नाही की, ज्यांच्या नावावर ९ सिम आहेत त्यांचे नंबर आजपासून बंद केले जातील. ९ मोबाइल कनेक्शन हीच परवानगीची कमाल मर्यादा आहे. मुख्य उद्देश त्या मर्यादेपेक्षा अधिक कनेक्शन घेण्यास प्रतिबंध करणे हा आहे.

त्यामुळे तुमच्या नावावर नेमके किती मोबाइल नंबर सुरू आहेत, हे एकदा तपासून घेणे महत्त्वाचे ठरू शकते. विशेषतः जुने किंवा वापरात नसलेले नंबर अजूनही तुमच्या नावावर सक्रिय आहेत का, याची खात्री करून घेतल्यास पुढे नवीन सिम घेताना अडचण टाळता येऊ शकते.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nagpur : जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री क्लोरीन वायूची गळती; ४० हून अधिक जण रुग्णालयात दाखल, VIDEO

'खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार नोंदणी; ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण लवकरच लागू; पालिका सभागृहाची मंजुरी

Ulhasnagar: घरे-दुकानांवरील 'रुंदीकरणाची टांगती तलवार' दूर होणार; ३६ ऐवजी २४ मीटरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

माथेरानमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक; दररोज ३० ते ४० रुग्णांवर उपचार; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

कोळंबीसह ओल्या बोंबीलची आवक वाढली; मासळी बाजारात ग्राहकांची गर्दी; खवय्यांमध्ये उत्साहाचे वातावरण