लाईफस्टाईल

Monsoon Tips : पावसाळ्यात घामाच्या दुर्गंधीला ‘रामराम’! घरगुती उपायांनी मिळवा दिवसभर ताजेपणा

पावसाळा म्हणजे आर्द्रतेची साथ आणि त्याच्यासोबत येणाऱ्या अनेक तक्रारी, जसे की त्वचेचा चिकटपणा, खाज सुटणे आणि विशेषतः घामाच्या वासाचा त्रास. या काळात केवळ साबणाने अंघोळ करणे पुरेसे राहत नाही. तरीही महागडे प्रॉडक्ट वापरायची गरज नाही, कारण घरगुती सोप्या उपायांनी तुम्ही या समस्यांवर सहज मात करू शकता.

Mayuri Gawade

पावसाळा म्हणजे आर्द्रतेची साथ आणि त्याच्यासोबत येणाऱ्या अनेक तक्रारी, जसे की त्वचेचा चिकटपणा, खाज सुटणे आणि विशेषतः घामाच्या वासाचा त्रास. या काळात केवळ साबणाने अंघोळ करणे पुरेसे राहत नाही. तरीही महागडे प्रॉडक्ट वापरायची गरज नाही, कारण घरगुती सोप्या उपायांनी तुम्ही या समस्यांवर सहज मात करू शकता.

तुमच्या अंघोळीच्या पाण्यात तुरटी थोडीशी बारीक करून मिसळा; यामुळे खाज आणि दुर्गंधी दूर होते. कडुलिंबाची पाने उकळून त्याचा वापर अंघोळीच्या पाण्यात केल्यास हे नैसर्गिक बॅक्टेरिया नाशक म्हणून काम करते आणि त्वचा ताजी राहते.

याशिवाय, लेमनग्रास किंवा निलगिरी तेलाचे दोन-दोन थेंब अंघोळीच्या पाण्यात टाकल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि बॅक्टेरियांची वाढ थांबते. हे घरगुती घटक घाम आणि वास याला दूर ठेवतात आणि दिवसभर ताजेपणा देतात.

या साध्या, पण प्रभावी उपायांनी तुम्ही पावसाळ्यातील आर्द्रतेचा त्रास टाळू शकता, तोही कोणत्याही महागड्या स्किनकेअर प्रॉडक्टशिवाय. त्यामुळे यंदा पावसाळा येताच ताजेतवाने आणि स्वच्छ राहण्यासाठी या घरगुती टिप्स नक्की वापरून पाहा.

(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून