वारंवार तोंड येतंय? उष्णतेमुळे होणाऱ्या Mouth Ulcers वर करून पाहा हे घरगुती उपाय 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Health Tips : वारंवार तोंड येतंय? उष्णतेमुळे होणाऱ्या Mouth Ulcers वर करून पाहा हे घरगुती उपाय

उष्णतेमुळे वारंवार तोंड येतंय? Mouth Ulcers वर आराम मिळवण्यासाठी मध, तूप, नारळपाणी आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांसारखे सोपे घरगुती उपाय जाणून घ्या.

Mayuri Gawade

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढली की त्याचा परिणाम थेट आरोग्यावर दिसू लागतो. अनेकांना या दिवसांत वारंवार तोंड येणे, जळजळ होणे किंवा तोंडात लहान पांढरे फोड येण्याचा त्रास जाणवतो. खाणं-पिणं करतानाही तोंड झोंबू लागल्याने दैनंदिन जीवन त्रासदायक होतं.

तज्ज्ञांच्या मते, शरीरातील उष्णता वाढणे, पाण्याची कमतरता, तिखट पदार्थांचं अतिसेवन, झोप अपुरी होणं किंवा तणाव यामुळे Mouth Ulcers म्हणजेच तोंडातील अल्सरची समस्या वाढू शकते. काही सोपे घरगुती उपाय केल्यास या त्रासातून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

Mouth Ulcers म्हणजे नेमकं काय?

तोंडाच्या आतील भागात, जीभेवर, ओठांच्या आतील बाजूला किंवा गालांच्या आत येणाऱ्या छोट्या जखमा किंवा फोडांना Mouth Ulcers म्हणतात. यामुळे जळजळ, वेदना आणि खाण्यात त्रास होऊ शकतो.

तोंड येण्यामागची प्रमुख कारणं

  • शरीरातील वाढलेली उष्णता

  • कमी पाणी पिणं

  • खूप तिखट किंवा आंबट पदार्थ

  • तणाव आणि अपुरी झोप

  • पचन बिघडणं

  • काही व्हिटॅमिन्सची कमतरता

आराम देणारे घरगुती उपाय

१. नारळपाणी आणि दही

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी नारळपाणी फायदेशीर ठरू शकतं. दह्यामुळेही शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत मिळते.

२. तूप लावून पाहा

तोंड आलेल्या जागेवर थोडं तूप लावल्यास जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते.

३. मधाचा वापर

मधामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे अल्सरवर थोडा मध लावल्यास आराम मिळू शकतो.

४. हळद आणि मधाची पेस्ट

चिमूटभर हळदीमध्ये मध मिसळून तयार केलेली पेस्ट अल्सरवर लावल्यास सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.

५. तुळशीची पाने

सकाळी २ ते ३ तुळशीची पाने चावून खाल्ल्यास तोंडातील जंतू कमी होण्यास मदत मिळू शकते.

६. मिठाच्या पाण्याने गुळण्या

थेट मीठ लावण्यापेक्षा कोमट मिठाच्या पाण्याने दिवसातून २ ते ३ वेळा गुळण्या करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.

आहारात काय टाळाल?

तोंड आल्यावर:

  • खूप तिखट पदार्थ

  • तेलकट खाद्यपदार्थ

  • अतिउष्ण पेय

  • जंक फूड

हे शक्यतो टाळणं योग्य ठरतं.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर तोंड वारंवार येत असेल, जखमा दीर्घकाळ भरत नसतील किंवा वेदना वाढत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

(Disclaimer : या लेखातील माहिती ही सर्वसाधारण आरोग्य व आहारविषयक माहितीनुसार देण्यात आली आहे.‘नवशक्ति’ या माहितीच्या अचूकता किंवा परिणामकारकतेची हमी देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! आता दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मोरा-मुंबई रो-रो सेवेचा एप्रिलचा मुहूर्त पुन्हा हुकला; ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडलेल्या स्थितीत

खड्डा चुकवताना रिक्षा थेट नदीत कोसळली; पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

देवस्थानांकडचे मोठे भूखंड होणार खुले; इनामी जमीन रद्द करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

मोठी बातमी! सुधारित पेन्शन योजना आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक; शासनाकडून नवीन परिपत्रक जारी