लाईफस्टाईल

Diwali Faral Tips : आता अनारसे फसणार नाहीत! दिवाळी फराळात होणार जाळीदार, हलके - फुलके अनारसे

गोड, कुरकुरीत, जाळीदार अनारसा बनवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा कितीही काळजी घेतली तरीही अनारसे तळताना विरघळतात. म्हणून अनारसे बनवण्यासाठी नेहमी चिकट नसलेला जुना तांदूळ वापरा...

Mayuri Gawade

दिवाळीचा सण येण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत आणि घराघरात फराळ बनवण्याची धूम सुरू आहे. लाडू, चकली, शंकरपाळ्या, चिवडा यांसारखे पारंपरिक पदार्थ तर बनवले जात आहेतच, पण प्रत्येक घरातील खास आव्हान म्हणजे ‘अनारसे’. गोड, कुरकुरीत, जाळीदार अनारसा बनवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा कितीही काळजी घेतली तरीही अनारसे तळताना विरघळतात, जाळीदार होत नाहीत किंवा पीठ कच्चे राहते.

अनारसे बनवताना घ्यावयाची काळजी :

  • तांदूळ जुना घ्या : अनारसे बनवण्यासाठी नेहमी चिकट नसलेला जुना तांदूळ वापरा. कोलम किंवा बासमती तुकडा तांदूळ योग्य राहतो. तांदुळातलं पाणी दररोज बदलत राहावे.

  • फॅनखाली वाळवून घ्या : तांदूळ उन्हात जास्त वेळ वाळवू नका, फॅनखाली पटकन वाळवून घ्या आणि थोडा थंड झाल्यावरच हात लावा.

  • गूळ किसून घालणे : पीठ मळताना गूळ किसून घालणे सोपे जाते आणि पीठ व्यवस्थित मळते.

  • साठवलेले पीठ वापरा : पिठ पातळ झाले किंवा घट्ट झाले तर, थोडे बाजूला काढून ठेवा. आवश्यक असल्यास केळं किंवा तूप मिसळा.

  • ओलसरपणा तपासा : पिठात किती ओलसरपणा आहे ते तपासूनच गूळ हळूहळू घाला; खूप गूळ एकाचवेळी घालू नका.

  • तूपाचा हात लावणे आवश्यक : पीठ मळताना तूपाचा हात लावून एकजीव होईपर्यंत मळा.

  • अनारसे तयार करताना : सारणाचा बारीक गोळा करून त्याला गोल आकार देत तळा.

  • विरघळणारे अनारसे : जर अनारसे तळताना विरघळत असतील, तर पिठात थोडा रवा मिसळून रात्रभर भिजवा.

  • कुरकुरीत करण्यासाठी : कोरड्या पिठात २ चमचे गरम तूप घालल्यास अनारसे हलके, फुलके आणि कुरकुरीत होतात.

  • पीठ व्यवस्थित भिजवा : पीठ व्यवस्थित भिजल्यावरच अनारसे तयार करा; नीट मुरलेल्या पीठानेच अनारसे फसत नाहीत.

या सोप्या टिप्स पाळल्यास यंदाच्या दिवाळीत अनारसे एकदम कुरकुरीत, हलके आणि जाळीदार होतील. फराळाच्या या पारंपरिक पदार्थाने घरात सणाची गोडसरता आणून उत्साह वाढेल.

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

मुंबईच्या अतिखराब हवेला बांधकाम, वाहन प्रदूषण जबाबदार; IIT चे हवामान शास्त्रज्ञ अंशुमन मोदी यांचा आरोप

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान