संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी १७ वर्षांनंतर पूर्ण, निकाल राखीव

२००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. एनआयए न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आदींची कसून तपासणी केली. आरोपी व सरकारी यंत्रणांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने निकालासाठी वेळ मागितला.

Swapnil S

मालेगाव : २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. हा निकाल ८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, असे एनआयए कोर्टाने सांगितले.

एनआयए न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आदींची कसून तपासणी केली. आरोपी व सरकारी यंत्रणांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने निकालासाठी वेळ मागितला. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ आरोपी असल्याने याच्या सुनावणीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात होती.

हा स्फोट २९ सप्टेंबर २००८ रोजी झाला होता. ज्यात ६ जणांचा मृत्यू, तर १०० जण जखमी झाले होते.

या प्रकरणाचा निकाल पीडित कुटुंबाबरोबरच देशातील न्यायव्यवस्था व दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी धोरणांसाठी महत्वाचा असेल. मालेगाव स्फोटाने धार्मिक व सामाजिक तणाव वाढवला होता.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती.

Iran Israel War : इराणच्या सर्वोच्च नेता निवडी‌वेळी इस्रायलचा हल्ला; लेबनॉनची राजधानी बैरूतवर हवाई हल्ले

भारताकडे २५ दिवसांचा तेल साठा; केंद्र सरकारच्या सूत्रांची माहिती

Iran Israel War : आखाती भागातील १ कोटी भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य; परराष्ट्र खात्याचे प्रतिपादन

आखाती युद्धाचा फटका आता शेतकऱ्यांनाही; JNPT त अडकले शेकडो कंटेनर; दुबई बाजारपेठ बंद असल्याने केळी, कांद्याची निर्यात ठप्प

मुंबईसह राज्यभर धुळवडीचा जल्लोष; राजकीय नेते, सेलिब्रिटीही रंगले रंगात