संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी १७ वर्षांनंतर पूर्ण, निकाल राखीव

२००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. एनआयए न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आदींची कसून तपासणी केली. आरोपी व सरकारी यंत्रणांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने निकालासाठी वेळ मागितला.

Swapnil S

मालेगाव : २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. हा निकाल ८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, असे एनआयए कोर्टाने सांगितले.

एनआयए न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आदींची कसून तपासणी केली. आरोपी व सरकारी यंत्रणांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने निकालासाठी वेळ मागितला. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ आरोपी असल्याने याच्या सुनावणीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात होती.

हा स्फोट २९ सप्टेंबर २००८ रोजी झाला होता. ज्यात ६ जणांचा मृत्यू, तर १०० जण जखमी झाले होते.

या प्रकरणाचा निकाल पीडित कुटुंबाबरोबरच देशातील न्यायव्यवस्था व दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी धोरणांसाठी महत्वाचा असेल. मालेगाव स्फोटाने धार्मिक व सामाजिक तणाव वाढवला होता.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती.

मुंबईत उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी

WhatsApp Plus: व्हॉट्सॲप प्रीमियम प्लॅन लवकरच; कस्टम थीम, स्टिकर्स आणि नवीन फीचर्ससाठी किती पैसे मोजावे लागणार?

झटपट गोरे होण्याचा नाद जीवावर; नागपुरात पाकिस्तानी क्रीममुळे महिलांना किडनीचे विकार; संभाजीनगरनंतर FDA ची मोठी कारवाई

Tanvi Kolte : मराठी जिंकलं, आता 'बिग बॉस हिंदी'मध्ये एंट्री? विजेत्या तन्वी कोलतेने दिलं उत्तर; म्हणाली - "ऑफर मिळाली..."

सुभाषचंद्र बोस यांना ‘राष्ट्रपुत्र’ घोषित करा; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली