संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी १७ वर्षांनंतर पूर्ण, निकाल राखीव

२००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. एनआयए न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आदींची कसून तपासणी केली. आरोपी व सरकारी यंत्रणांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने निकालासाठी वेळ मागितला.

Swapnil S

मालेगाव : २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. हा निकाल ८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, असे एनआयए कोर्टाने सांगितले.

एनआयए न्यायालयाने सर्व पक्षकारांचे युक्तिवाद, साक्षीदारांची साक्ष आदींची कसून तपासणी केली. आरोपी व सरकारी यंत्रणांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने निकालासाठी वेळ मागितला. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ आरोपी असल्याने याच्या सुनावणीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात होती.

हा स्फोट २९ सप्टेंबर २००८ रोजी झाला होता. ज्यात ६ जणांचा मृत्यू, तर १०० जण जखमी झाले होते.

या प्रकरणाचा निकाल पीडित कुटुंबाबरोबरच देशातील न्यायव्यवस्था व दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी धोरणांसाठी महत्वाचा असेल. मालेगाव स्फोटाने धार्मिक व सामाजिक तणाव वाढवला होता.

२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया