महाराष्ट्र

वादळामुळे ४०० मच्छीमार आगरदांडाच्या आश्रयाला; मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्तांची बंदरास भेट

१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातल्यामुळे सर्व बोटी किनाऱ्यांवरच होत्या.

Swapnil S

मुरूड-जंजिरा : हवामानात अचानक बदल होऊन वादळी पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे व समुद्र खवळल्याने मासेमारीकरिता गेलेल्या ठिकठिकाणांच्या ४०० बोटी आगरदांडा बंदरकिनारी आश्रयाला आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावेळी संजय पाटील (सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग), तुषार वाळुंज (मुरूड परवाना मत्स्यव्यवसाय विभाग अधिकारी), अक्षय साळुंखे (श्रीवर्धन परवाना मत्स्यव्यवसाय विभाग अधिकारी) यांनी आगरदांडा बंदरावर येऊन आश्रयाला आलेल्या बोट मालक व खलाशी यांची चौकशी करून विचारपूस केली.

१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी करण्यास शासनाने बंदी घातल्यामुळे सर्व बोटी किनाऱ्यांवरच होत्या.

नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसांपासून मासेमारीला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली. परंतु सतत ३ दिवसपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असल्यामुळे समुद्र देखील खवळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे मासेमारी गेलेल्या बोटीतील नाखवानी व खलाशांनी आपआपल्या बोटी आगरदांडा बंदराजवळील समुद्रात नागर टाकून आश्रयाला थांबल्या. यामध्ये दापोली, करंजा, अलिबाग, राजपुरी, एकदरा मुरूड व गुजरात राज्यातील व्हेरावल बंदर भागातील अशा ४०० बोटी किनाऱ्यावर लावल्या असून वादळ कमी होण्याची प्रतीक्षा मच्छीमार बांधव करीत आहेत. या वादाळामुळे कोळी मच्छीमार बांधवांवर पुन्हा संकट आले असून तो आर्थिक संकटात सापडला आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने शासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात मासेमारी करणारे नाखवा व खलाशांनी किनारा दिसेल तिथे सुरक्षेच्या दृष्टीने आपापल्या बोटी दिघी व आगरदांडाचा आश्रय घेतला आहे. अंदाजे ४०० बोटी आश्रयाला आल्या आहेत. वातावरण चांगले झाले की बोटी पुन्हा मासेमारीकरिता रवाना होतील.
- तुषार वाळुंज, विभाग अधिकारी परवाना मत्स्य व्यवसाय, मुरूड

कोकणचा काजू आता ‘जागतिक ब्रँड’ होणार; ४० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : "लक्ष द्या जरा साहेब!" ; बोरिवली स्थानकावरील पादचारी पुलाला तडे? व्हायरल व्हिडिओमुळे प्रवाशांमध्ये चिंता

परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातील ST डेपो दुर्लक्षित; १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलन, शिवसेना उबाठा आक्रमक

Mumbai : वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा अहवाल द्या; राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांचे निर्देश

साताऱ्यातील कण्हेर धरणावरील हेल्पर ते केनियातील कृषी सम्राट; कष्ट आणि जागतिक यशाची भावस्पर्शी प्रेरणागाथा