महाराष्ट्र

जयश्रीच्या कुटुंबातील ७ जण ढिगाऱ्याखाली !

मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला पनवेल येथील आश्रमात टाकले होते

नवशक्ती Web Desk

इरशाळवाडी (खालापूर): सध्या पनवेल येथे आश्रमात राहून १२ वीचे शिक्षण घेत असलेल्या जयश्री किशन वाघ हिचे अख्खे कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. सात जणांच्या या कुटुंबातील एकाचीही तिला माहिती मिळालेली नाही. जयश्री ही पनवेलला राहत असल्याने ती या दुर्घटनेतून बचावली. तिच्या कुटुंबातील कुणीही थांगपत्ता लागत तिच्या डोळ्यातील पाणी अश्रूंचा महापूर सुरू आहे. जयश्रीचे आई, वडील, आजी, आजोबा, लहान भाऊ, आत्या आणि आत्याचा मुलगा असे एकूण ७ जण ढिघाऱ्याखाली अडकले आहेत. जयश्रीचे वडील मजुरी करतात. आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला पनवेल येथील आश्रमात टाकले होते.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली