महाराष्ट्र

जयश्रीच्या कुटुंबातील ७ जण ढिगाऱ्याखाली !

मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला पनवेल येथील आश्रमात टाकले होते

नवशक्ती Web Desk

इरशाळवाडी (खालापूर): सध्या पनवेल येथे आश्रमात राहून १२ वीचे शिक्षण घेत असलेल्या जयश्री किशन वाघ हिचे अख्खे कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. सात जणांच्या या कुटुंबातील एकाचीही तिला माहिती मिळालेली नाही. जयश्री ही पनवेलला राहत असल्याने ती या दुर्घटनेतून बचावली. तिच्या कुटुंबातील कुणीही थांगपत्ता लागत तिच्या डोळ्यातील पाणी अश्रूंचा महापूर सुरू आहे. जयश्रीचे आई, वडील, आजी, आजोबा, लहान भाऊ, आत्या आणि आत्याचा मुलगा असे एकूण ७ जण ढिघाऱ्याखाली अडकले आहेत. जयश्रीचे वडील मजुरी करतात. आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला पनवेल येथील आश्रमात टाकले होते.

'बॅचलर्सना परवानगी नाही' म्हणत मालकिणीलाच घर खाली करायला सांगितलं; सोसायटी बोर्ड मेंबर्सना २२ वर्षांच्या तरुणीने शिकवला धडा

ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! वेळ आणि स्थळही सांगितलं; संजय राऊत यांची पोस्ट पुन्हा चर्चेत

राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीवर सुप्रिया सुळेंचे भाष्य; "ठाकरे बंधू एकत्र आले तर...

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

BCCIचा मोठा निर्णय! महिला खेळाडूही होणार मालामाल; देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ