महाराष्ट्र

जयश्रीच्या कुटुंबातील ७ जण ढिगाऱ्याखाली !

मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला पनवेल येथील आश्रमात टाकले होते

नवशक्ती Web Desk

इरशाळवाडी (खालापूर): सध्या पनवेल येथे आश्रमात राहून १२ वीचे शिक्षण घेत असलेल्या जयश्री किशन वाघ हिचे अख्खे कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. सात जणांच्या या कुटुंबातील एकाचीही तिला माहिती मिळालेली नाही. जयश्री ही पनवेलला राहत असल्याने ती या दुर्घटनेतून बचावली. तिच्या कुटुंबातील कुणीही थांगपत्ता लागत तिच्या डोळ्यातील पाणी अश्रूंचा महापूर सुरू आहे. जयश्रीचे आई, वडील, आजी, आजोबा, लहान भाऊ, आत्या आणि आत्याचा मुलगा असे एकूण ७ जण ढिघाऱ्याखाली अडकले आहेत. जयश्रीचे वडील मजुरी करतात. आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला पनवेल येथील आश्रमात टाकले होते.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी