महाराष्ट्र

जयश्रीच्या कुटुंबातील ७ जण ढिगाऱ्याखाली !

नवशक्ती Web Desk

इरशाळवाडी (खालापूर): सध्या पनवेल येथे आश्रमात राहून १२ वीचे शिक्षण घेत असलेल्या जयश्री किशन वाघ हिचे अख्खे कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. सात जणांच्या या कुटुंबातील एकाचीही तिला माहिती मिळालेली नाही. जयश्री ही पनवेलला राहत असल्याने ती या दुर्घटनेतून बचावली. तिच्या कुटुंबातील कुणीही थांगपत्ता लागत तिच्या डोळ्यातील पाणी अश्रूंचा महापूर सुरू आहे. जयश्रीचे आई, वडील, आजी, आजोबा, लहान भाऊ, आत्या आणि आत्याचा मुलगा असे एकूण ७ जण ढिघाऱ्याखाली अडकले आहेत. जयश्रीचे वडील मजुरी करतात. आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला पनवेल येथील आश्रमात टाकले होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस