महाराष्ट्र

भारत गौरव रेल्वेच्या ९० प्रवाशांना विषबाधा पुणे स्थानकात उपचारानंतर तासाभराने गाडी रवाना

गटाने खाजगीरित्या खाद्यपदार्थ खरेदी केले होते आणि ते खाद्यपदार्थ रेल्वे किंवा इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारे पुरवलेले नव्हते.

नवशक्ती Web Desk

पुणे : चेन्नई ते पालिताना दरम्यान खासगीरीतीने आरक्षित केलेल्या भारत गौरव या विशेष रेल्वे गाडीतील सुमारे ९० प्रवाशांना अन्नविषबाधा झाल्याने त्यांना पुणे रेल्वे स्थानकात रेल्वे गाडी थांबवून आवश्यक ते उपचार करण्यात आले. पुणे रेल्वे स्थानकात गाडी थांबवून तेथे डॉक्टरांनी येऊन तपासणी करून प्रवाशांवर उपचार केले. सुमारे ५० मिनिटे थांबल्यानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, 'भारत गौरव' ट्रेन गुजरातमधील पालिताना येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी एका गटाने खाजगीरित्या बुक केली होती. गटाने खाजगीरित्या खाद्यपदार्थ खरेदी केले होते आणि ते खाद्यपदार्थ रेल्वे किंवा इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारे पुरवलेले नव्हते.

प्रवाशांनी खाल्लेले खाद्यपदार्थ पॅन्ट्री कारमध्ये तयार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले."एका डब्यातील सुमारे ८० ते ९० प्रवाशांनी सोलापूर ते पुणे दरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार केली. त्यांनी मळमळ, हलके हालचाल आणि डोकेदुखीची तक्रार केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. सर्व प्रवाशांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन