एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; अमळनेरमध्ये धक्कादायक घटना प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; अमळनेरमध्ये धक्कादायक घटना

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे पती-पत्नीने दोन मुलांसह धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेने परिसरात खळबळ उडाली.

Swapnil S

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह दोन लहान मुलांनी धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल तसेच त्यांचा दुसरीत शिकणारा मुलगा सनी आणि अंगणवाडीत जाणारा राज हे चौघे पहाटे चारच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी धावत्या रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा असली तरी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

Nepal Floods : अडकलेल्यांमध्ये मुंबईचे दोन नामांकित डॉक्टर

'मराठी'साठी एक वर्षाची मुदतवाढ; फडणवीसांची घोषणा; रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी?

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी आणखी ४ विशेष गाड्या; उद्यापासून आरक्षण सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मोहन भागवत यांचा व्हिसा रद्द करण्याची मागणी