असिम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती; बार कौन्सिल ऑफ इंडियाचा निर्णय 
महाराष्ट्र

असिम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती; बार कौन्सिल ऑफ इंडियाचा निर्णय

असिम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल, न्यायव्यवस्था आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर टिकात्मक विधाने केली होती. त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

Swapnil S

मुंबई/पुणे : प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल, न्यायव्यवस्था आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर केलेल्या टिकात्मक विधानाप्रकरणी सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या निर्णयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे.

असिम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल, न्यायव्यवस्था आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर टिकात्मक विधाने केली होती. त्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी त्यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या आदेशाविरोधात अॅड. सरोदे यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागितली होती. त्यानुसार असिम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे.

असिम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी असलेल्या वकीलांपैकी एक आहेत. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात राज्यपाल, न्यायव्यवस्था आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात वक्तव्य केल्यावर एका तक्रारदारने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बार कौन्सिलने अॅड. सरोदे यांचे वक्तव्य हे बेजाबाबदार, अशोभनीय आणि बदनामीकारक असल्याचे सांगत त्यांची सनद तीन महिने रद्द आणि २५ हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला होता. सनद रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यावर ॲड. सरोदे म्हणाले की, “सत्याचा विजय होण्याची सुरुवात कधीतरी होत असते. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे मी आभार मानतो.”

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती